Monday, February 3, 2025

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
मानवत,/प्रतिनिधी 
येथील राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अकरावी व बारावीतील वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले होते यात सकाळ-सत्रामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर अंकुश भाऊ लाड अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांत लिंग काळे प्रमुख अतिथी रितेश भैया काळे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी मुख्य मार्गदर्शक श्री बजरंग ग्रीडा शिक्षण विस्तार अधिकारी मानवतप्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी आत्माराम कुठे  दत्ताभाऊ चौधरी नगरसेवक मानवत  श्री किसन भिसे अध्यक्ष स्पोर्ट अकॅडमी मानवत काशिनाथ शिंदे संचालक समाज प्रबोधन संस्था पात्री लक्ष्मण पाठक प्राचार्य महात्मा बसेश्वर कनिष्ठ महाविद्यालय रामटाकळी तसेच सत्यशील धबडगे दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी मानवत उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक अंकुश भाऊ लाड यांनी मानवत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्तेची गरज असून शैक्षणिक कार्यासाठी व मानवत शहराच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न शील असून शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मानवत शहरांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानवत शहर हे शिक्षणाचे माहेरघर झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बजरंग गिलडा यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेयरणादायी गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत घेतली तर विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होतो यासाठी अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले 
तसेच ग्रामीण कवी आत्माराम कुठे यांनी उत्कृष्ट अशा देशभक्तीपर सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानावर कविता सादर केल्या माय बापावर प्रेम करा ही कविता सादर केली प्रेमावर कविता करून तरुणांची मने जिंकलीशेतकरी दादा तुला दलाला लुटलं या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर हास्यविनोद करून कार्यक्रमात रंगत आणत विद्यार्थ्यांची मनी जिंकली मानवत शहरातील राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांनी मानवत चे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकवले अशा गौरी दहे आरती चव्हाण व संध्या पिंपळेया विद्यार्थिनीचा युवानेते डॉ अंकुश भाऊ लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मानवत शहरातील निर्भया पथक प्रमुख शकुंतला ताई चणे यांचा प्राचार्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी अध्यक्ष समारोप करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात त्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष शांत लिंग काळे यांनी सांगितले या कार्यक्रमात आनंद नांदगावकर सर यांनी काढलेल्या स्नेहसंमेलनाच्या उत्कृष्ट रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भगवान घाटूळ यांनी तर सूत्रसंचालन गोविंद रासवे सर यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य शिवशक्ती कुकडे मॅडम यांनी केले 
यानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व दुपार सत्राला सुरुवात झाली याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळी लावणी लोकगीत कथक नृत्य पोवाडा शाहिरी अशा विविध कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या तसेच शेलापागोटे व संगीत शेलापागोटेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच प्राध्यापक संतोष पवार यांनी केलेल्या अनेक शेरोशायरी मधून कार्यक्रमाला रंगत आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत जोजारे कुरेशी सर काशिनाथ जाधव यांनी केलेआणि शेवटी संगीतावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनसोक्त डान्स करत आनंद घेतला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांती लिंग काळे सर यांनी विद्यालयातील उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिवशक्ती कुकडे प्रा संतोष पवार प्रा  भगवान घाटूळ गोविंद रासवे गोविंद पाटील प्रा अनुसया काळे दैवशाला शिरसागर सुनिता शिंदे  प्रा शिवराज गिराम प्रा गजानन चौरे प्रा मुंजाजी कांबळे प्रवीण पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment