Thursday, March 12, 2026

परभणी शहरातील जिंतूर रोडवरील बॅरिकेट्स हटवण्याची नगरसेवकांची मागणी


परभणी शहरातील जिंतूर रोडवरील बॅरिकेट्स हटवण्याची नगरसेवकांची मागणी
परभणी / प्रतिनिधी
परभणी शहरातील जिंतूर रोड येथील जांब नाका दर्गा कमान समोरील मुख्य रस्त्यावर शहर वाहतूक सुरक्षा पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेट्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी दर्गा रोड प्रभाग क्रमांक ११ परभणी महानगरपालिकेतील नगरसेवकांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिंतूर रोडवरील जांब नाका दर्गा कमान समोरील रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. सदर रस्ता हा सरकारी दवाखान्याकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे रुग्णवाहिका तसेच रुग्णांना दवाखान्यात ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच दर्गा रोड परिसरातील नागरिकांसाठी हा मुख्य मार्ग असून परिसरातील अनेक रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.
यामुळे सदर ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स तात्काळ हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर इनामदार नदिम अहमद, शमशाद बेगम सय्यद इलाही राज, जाकीरा बेगम मोहम्मद नईमुद्दीन, रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद जागीरदार आणि खान मुसदिक नुरुल्ला खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Sunday, March 1, 2026

आंबेडकर नगर पश्चिम भागातील जागा मोजणीला अखेर सुरुवात [] डॉ. अंकुश लाड यांच्या पाठपुराव्याला यश[]

आंबेडकर नगर पश्चिम भागातील जागा मोजणीला अखेर सुरुवात
[] डॉ. अंकुश लाड यांच्या पाठपुराव्याला यश []
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील आंबेडकर नगर पश्चिम भागातील गेल्या २० ते २५ वर्षांपासून रखडलेला जागा मोजणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या प्रभागातील नागरिकांकडून वारंवार युवा नेते तथा उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्याकडे या विषयाबाबत मागणी करण्यात येत होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर या जागेच्या मोजणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या कामाची सुरुवात डॉ. अंकुश लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली. अनेक पिढ्यांनी ज्या कामाची प्रतीक्षा केली, ते काम आता पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसरात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नगरसेवक राजू भैय्या खरात, नगरसेवक गणेश भाऊ उगले, ओमभाऊ सिद्धार्थ ढाले, समाजसेवक असद खान, नगर परिषद मानवत येथील अभियंते तसेच आंबेडकर नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, February 27, 2026

मानवत शहरातील अवाजवी करवाढीला डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकाराने लगाम

मानवत शहरातील अवाजवी करवाढीला डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकाराने लगाम; चतुर्थ वार्षिक कर आकारणी स्थगित!

[] मानवत नगरपरिषद स्तरावर ऐतिहासिक ठराव मंजूर []

मानवत / मुस्तखीम बेलदार
प्रशासकीय काळात मानवत नगर परिषदेत प्रशासकामार्फत  करण्यात आलेली  चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असल्याने ही प्रक्रिया नगरपरिषद स्तरावर तात्काळ स्थगित करण्याचा आणि त्यात मूलभूत सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नवनिर्वाचित कार्यकारिणीने मंजूर केला. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते डॉ. अंकुश बालाजी लाड यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. तसेच व्यावसायिक मालमत्ता वरील दुप्पट कर आकारणी रद्द करून ती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  वार्षिक भाडे मूल्य ही वास्तववादी पातळीवर कमी केले जाणार आहे.

नगरपरिषद मानवत ह‌द्दीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप यादी आणि त्याबाबतचा प्रशासकीय ठराव क्र. २९३ (दि. ०६/०२/२०२५) हा शहरातील आर्थिक परिस्थिती आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली सन २०२६-२७ ते २०२९-३० या चतुर्थ वार्षिक कालावधीसाठी कर आकारणीची प्रारूप यादी शहराच्या भौगोलिक परिस्थितीशी आणि नागरिकांच्या आर्थिक क्षमतेशी विसंगत असल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेमुळे जनसामान्यांमध्ये असंतोष असून, नगरपरिषद प्रशासनाने स्थानिक पातळीवरच या प्रक्रियेचा फेरविचार करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सुधारित ठराव मंजूर करण्यात येत आहे:

मंजूर ठरावरील महत्त्वाचे मुद्दे:
१) सध्या सुरु असलेली चतुर्थ वार्षिक कर आकारणीची प्रक्रिया नगरपरिषद स्तरावर  स्थगित करण्यात येत आहे. सुधारणा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणतीही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊ नये.
२) झोन निश्चित करताना झालेल्या त्रुटी आर्थिक स्तरानुसार झोन निश्चीती करताना संबंधित एजन्सीने फेरसर्वेक्षण करावे.

3) करयोग्य मूल्यावर आकारलेला करदर हा 'क' वर्ग नगरपरिषदेसाठी जास्त आहे. नागरिकांवरील बोजा या नवीन कर दराने कमी व्हावा.

४) व्यावसायिक मालमतांसाठी असलेली दुप्पट कर आकारणी रद्द करून ती निवासी दराच्या  (दीडपट) करण्यात यावी.

५) वार्षिक भाडेमूल्याची गणना करताना सध्याचे बाजारभाव आणि मालमतेची स्थिती यांचा वस्तुनिष्ठ विचार करून त्यात कपात करण्यात यावी.

६) नगर परिषद प्रशासनाने प्रभागनिहाय विशेष शिबिरे आयोजित करावीत. प्रत्येक नागरिकाच्या हरकतीवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करावी आणि सुधारित दराने आकारणी करावी.

७) सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्था, स्वातंत्र्य सैनिक व दिव्यांग यांना नियमानुसार योग्य ती करसवलत देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

ठरावः नगरपरिषद प्रशासनाने वरील सर्व सुधारणांचा अंतर्भाव करूनच नवीन सुधारित प्रारूप यादी तयार करावी. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही करवाढ लागू करू नये. या सुधारणा होईपर्यत सध्याची प्रक्रिया पूर्णतः स्थगित राहील. सर्व सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, संबंधित एजन्सीने तयार केलेली सुधारित प्रारूप यादी व सविस्तर प्रस्ताव पुनश्च नगरपरिषद सभागृहाच्या पटलावर ठेवावा. सभागृहाच्या अंतिम मान्यतेशिवाय आणि चर्चेविना ही करवाढ लागू करण्यात येवु नये, नगरपरिषद प्रशासनाने वरील सर्व प्रक्रियेचे पालन करावे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

Thursday, February 19, 2026

आमसभेपूर्वी नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवावेत - डॉ अंकुश लाड

आमसभेपूर्वी नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवावेत - डॉ अंकुश लाड
मानवत/ प्रतिनिधी
२७ फेब्रुवारीला कर निर्धारण प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आमसभेपूर्वी जर नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवले तर या आमसभेत नागरिकांच्या आक्षेपामुळे आम्हाला कर निर्धारण प्रक्रियेला स्थगिती प्रस्ताव आणण्यास बळकटी येईल. नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवावेत असे आव्हान मानवत नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी मानवत शहरातील जनतेस केले आहे.

Monday, January 19, 2026

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
[] युवा पँथर्सचे मानवत पोलिस ठाण्यात निवेदन []
मानवत / प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील मौजे हमदापूर, ता. मानवत, जि. परभणी येथे गावातील काही जातिवादी गावगुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर संगनमत करून सामूहिक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा पँथर्स (मानवत, ता. मानवत, जि. परभणी) संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिनांक १९ जानेवारी  रोजी मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर हल्ल्यात ६ ते ८ पुरुष व ४ ते ५ महिलांना गंभीर मारहाण करण्यात आली असून, बालक व बालिकांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत अमानवी व समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी आरोपींना जामीन न देता, घटनेचा सखोल व तात्काळ तपास करून भादंवि कलम ३०७ सह अन्य गंभीर कलमे लावावीत, तसेच ज्यांच्यावर ठोस पुरावे आहेत अशा सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भविष्यात ग्रामीण भागातील बौद्ध समाजावर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अन्यथा युवा पँथर्स संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर रविभाऊ पंडित ,दीपक ठेंगे ,अमोल मगर ,जनार्दन कीर्तने , गौतम जमदाडे,नागसेन भदर्गे, विजय खरात ,किरण पंडित  आदिच्या स्वाक्षरी आहे.

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी [] युवा पँथर्सचे मानवत पोलिस ठाण्यात निवेदन [] मानवत / प्रतिनिधी मानवत तालुक्यातील मौजे हमदापूर, ता. मानवत, जि. परभणी येथे गावातील काही जातिवादी गावगुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर संगनमत करून सामूहिक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा पँथ�

Monday, January 12, 2026

मानवत शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी मोईन अन्सारी यांची नियुक्ती


मानवत शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी मोईन अन्सारी यांची नियुक्ती
मानवत / मुस्तखीम बेलदार 
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी मानवत तालुक्यात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी मा. सईद खान यांनी मानवत येथील मा. म. मोईन म. तकी अन्सारी यांची शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख मानवत या पदावर नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब  पक्षप्रमुख मा. आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेनुसार आणि मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीप्रसंगी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी, अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी जोडून घेण्यासाठी तसेच मानवत तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी मोईन अन्सारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल मानवत तालुक्यातील शिवसैनिक व अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांकडून मोईन अन्सारी यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Saturday, January 10, 2026

विकास पुरुष डॉ. अंकुश भाऊ लाड यांचा सत्कार

विकास पुरुष डॉ. अंकुश भाऊ लाड यांची मानवत नगरपालिका उपनगराध्यक्षपदी 
बिनविरोध  निवड झाल्याबद्दल डॉ. भिमराव प्रतिष्ठान महा-राज्य तर्फे त्यांचा स्वागत करण्यात आले यावेळी 
आशिष घुगे ,मूकतार भैय्या ,शेख वाजेद , सनीकेत  पौळ , आवेज शेख उपस्थित होते.
 

Tuesday, January 6, 2026

परभणी येथील दर्गारोड प्र. क्र. ११ मध्ये बदलाची लाट; काँग्रेस उमेदवारांना वाढता पाठिंबा


परभणी येथील दर्गारोड प्र. क्र. ११ मध्ये बदलाची लाट; काँग्रेस उमेदवारांना वाढता पाठिंबा

परभणी / प्रतिनिधी

दर्गा रोड, परभणी येथील प्रभाग क्रमांक ११ मधील १५ जानेवारी रोजी होणारी  महानगर पालिका निवडणूक आता थेट जनतेच्या हाती गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मागील आठ वर्षांमध्ये अपेक्षित असलेला विकास न झाल्याने प्रभागाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ते, नाल्या, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे दर्गा रोड प्रभाग क्रमांक ११ येथील जागृत मतदारांनी निवडणूक आपल्या हातात घेत काँग्रेस पक्षाचे उमेदवाराचा प्रचार स्वतः करत असताना दिसत आहे 
या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनता जनार्दन पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शमशाद बेगम सय्यद इलाही राज, जाकिरा बेगम मोहम्मद नय्युमुद्दीन, रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद तसेच मुसदिख खान नुरुल्ला खान उर्फ मुश्शु खान यांना प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
प्रभागातील सुज्ञ व जागरूक मतदारांनी यावेळी निवडणूक आपल्या हाती घेत बदल घडवून आणण्याचा निर्धार केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Friday, January 2, 2026

प्रभाग ११ दर्गा रोड परभणी येथील काँग्रेस उमेदवारांची प्रचारात आघाडी !


प्रभाग ११ दर्गा रोड परभणी येथील काँग्रेस उमेदवारांची प्रचारात आघाडी !

परभणी / प्रतिनिधी 
प्रभाग क्रमांक ११ दर्गा रोड, परभणी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शमशाद बेगम सय्यद इलाही राज, जाकिरा बेगम मोहम्मद नय्युमुद्दीन, रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद तसेच मुसदिख खान नुरुल्ला खान उर्फ मुश्शु खान यांनी निवडणूक प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे.
घराघरांत जाऊन, तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेत उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर भर देत विकासाचा अजेंडा मांडण्यात येत आहे . प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला जात आहे.
घरोघरी जाऊन मतदारापर्यंत पोहोचत विकास कार्याच्या आश्वासनावर हे उमेदवार मतदान नागरिकांना मागत आहेत यामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक अधिक रंगतदार बनली असून काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना   युवकासह सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे.मतदारांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता प्रभाग क्रमांक ११ मध्ये काँग्रेस उमेदवारांची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Sunday, December 21, 2025

मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय



मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय

२२ पैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; डॉ. अंकुश लाड यांची एकाकी झुंज यशस्वी

मानवत /प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागातील २२ पैकी तब्बल १६ जागांवर विजयी झेंडा फडकवला तर शिवसेना शिंदे गटाचे ४, भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीच्या राणी ताई अंकुश लाड यांनी ५३९१ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवत नगराध्यक्षपदावर शिक्का मोर्तब केला.
राणी अंकुश लाड यांना २३,९८९ पैकी १४,५८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सेना-भाजप युतीच्या अंजली कोक्कर यांना ९,१९६ मते पडली. रविवारी (ता.२१) तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत राणी लाड आघाडीवर राहिल्याने विजय निश्चित झाला होता.
प्रभाग क्रमांक १ अ मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार खरात विजयी झाले प्रभाग १ ब मध्ये अनुराधा वासुंबे विजयी झाले
प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेच्या विभा भदर्गे विजयी झाले. तर प्रभाग २ ब मध्ये ज्योती आळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुन्हाडेंचा नजीकच्या १० मतांनी पराभव करीत विजय मिळवला.
प्रभाग ३ अ राष्ट्रवादीचे किशोर लाड यांनी विजय मिळवला, ३ ब मध्ये नंदनी गणेश मोरे पाटील यांनी विजय संपादित केला 
४ अ द्वारका दत्तात्रय चौधरी यांनी विजय मिळविला तर ब मध्ये भाजपाचे उमेदवार शैलेंद्र राजेश्वर कत्रुवार यांनी विजय मिळविला ५ अ मध्ये विक्रम सिंह दहे यांनी फक्त दोन मतांनी विजय मिळविला तर ब मध्ये राष्ट्रवादीचे वृषाली राहटे यांनी विजय मिळविला ६ अ मध्ये मीरा मोहन लाड तर, ६ ब संजय कुमार बांगड यांनी विजय मिळविला, ७ अ मध्ये रेखा बाजीराव हालनोर यांनी विजय मिळविला, ७ ब मध्ये नियामत खान यांनी विजय मिळविला, ८ अ मध्ये शेख जवेरिया बेगम आहाद बेलदार तर ब मध्ये मोहम्मद बिलाल मोहम्मद युनूस बागवान यांनी यश संपादित केले ९ अ मध्ये सुशीला बालाजी लाड तर ब मध्ये भाग्यश्री स्वप्निल शिंदे हे विजयी झाले १० अ मध्ये रूपाली गणेश उगले तर ब मध्ये डॉक्टर अंकुश बालाजी लाड हे विजयी झाले ११ अ मध्ये डॉक्टर देवयानी राजेश्वर दहे तर ब मध्ये उ बा ठा चे दीपक  बारहाते हे विजयी झाले आहे 

विजयानंतर बोलताना डॉ. अंकुश लाड म्हणाले, "ही जिंकलेली बाजी माझी नाही, मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. भविष्यात विकासाला नवा वेग देत शहराचा चेहरा पालटू. जनतेचा विश्वास कायम ठेवू," असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला.
मानवत नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नामांकित नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सईद खान व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप आघाडीने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र अपेक्षेपेक्षा फिके पडत आघाडीला चार जागांपुरती मर्यादा राहावी लागली तर भाजपचा फक्त एक उमेदवार विजयी झाला.
निवडणुकीचा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऐतिहासिक यश ठरला असून मानवत शहरातील राजकीय समीकरणाला नवे परिमय मिळाले आहे. जनतेच्या विश्वासाने विकासाला दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय

मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणीताई अंकुश लाड यांचा दणदणीत विजय

२२ पैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; डॉ. अंकुश लाड यांची एकाकी झुंज यशस्वी

मानवत /प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागातील २२ पैकी तब्बल १६ जागांवर विजयी झेंडा फडकवला तर शिवसेना शिंदे गटाचे ४, भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीच्या राणी ताई अंकुश लाड यांनी ५३९१ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवत नगराध्यक्षपदावर शिक्का मोर्तब केला.
राणी अंकुश लाड यांना २३,९८९ पैकी १४,५८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सेना-भाजप युतीच्या अंजली कोक्कर यांना ९,१९६ मते पडली. रविवारी (ता.२१) तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत राणी लाड आघाडीवर राहिल्याने विजय निश्चित झाला होता.
प्रभाग क्रमांक १ अ मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार खरात विजयी झाले प्रभाग १ ब मध्ये अनुराधा वासुंबे विजयी झाले
प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेच्या विभा भदर्गे विजयी झाले. तर प्रभाग २ ब मध्ये ज्योती आळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुन्हाडेंचा नजीकच्या १० मतांनी पराभव करीत विजय मिळवला.
प्रभाग ३ अ राष्ट्रवादीचे किशोर लाड यांनी विजय मिळवला, ३ ब मध्ये नंदनी गणेश मोरे पाटील यांनी विजय संपादित केला
४ अ द्वारका दत्तात्रय चौधरी यांनी विजय मिळविला तर ब मध्ये भाजपाचे उमेदवार शैलेंद्र राजेश्वर कत्रुवार यांनी विजय मिळविला ५ अ मध्ये विक्रम सिंह दहे यांनी फक्त दोन मतांनी विजय मिळविला तर ब मध्ये राष्ट्रवादीचे वृषाली राहटे यांनी विजय मिळविला ६ अ मध्ये मीरा मोहन लाड तर, ६ ब संजय कुमार बांगड यांनी विजय मिळविला, ७ अ मध्ये रेखा बाजीराव हालनोर यांनी विजय मिळविला, ७ ब मध्ये नियामत खान यांनी विजय मिळविला, ८ अ मध्ये शेख जवेरिया बेगम आहाद बेलदार तर ब मध्ये मोहम्मद बिलाल मोहम्मद युनूस बागवान यांनी यश संपादित केले ९ अ मध्ये सुशीला बालाजी लाड तर ब मध्ये भाग्यश्री स्वप्निल शिंदे हे विजयी झाले १० अ मध्ये रूपाली गणेश उगले तर ब मध्ये डॉक्टर अंकुश बालाजी लाड हे विजयी झाले ११ अ मध्ये डॉक्टर देवयानी राजेश्वर दहे तर ब मध्ये उ बा ठा चे दीपक  बारहाते हे विजयी झाले आहे

विजयानंतर बोलताना डॉ. अंकुश लाड म्हणाले, "ही जिंकलेली बाजी माझी नाही, मानवत शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. भविष्यात विकासाला नवा वेग देत शहराचा चेहरा पालटू. जनतेचा विश्वास कायम ठेवू," असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला.
मानवत नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नामांकित नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सईद खान व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप आघाडीने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र अपेक्षेपेक्षा फिके पडत आघाडीला चार जागांपुरती मर्यादा राहावी लागली तर भाजपचा फक्त एक उमेदवार विजयी झाला.
निवडणुकीचा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऐतिहासिक यश ठरला असून मानवत शहरातील राजकीय समीकरणाला नवे परिमय मिळाले आहे. जनतेच्या विश्वासाने विकासाला दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Saturday, December 20, 2025

“मी आयुक्त होणार!” प्रकल्पांतर्गत नारेगाव  मनपा उर्दू शाळेचे विद्यार्थी आयुक्तांच्या घरी


"मी आयुक्त होणार!" प्रकल्पांतर्गत नारेगाव  मनपा उर्दू शाळेचे विद्यार्थी आयुक्तांच्या घरी

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी

मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, नारेगाव येथील विद्यार्थ्यांनी "मी आयुक्त होणार!" या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत थेट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या निवासस्थानी भेट दिली.
दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व प्रशासकीय जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या संकल्पनेतून "मी आयुक्त होणार!" हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दर रविवारी एका मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आयुक्तांचे पाहुणे बनवून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली जाते.
मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, नारेगाव येथील विद्यार्थी आदरणीय मुख्याध्यापकश्री. सय्यद अबरार अहमद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांच्या बंगल्यावर पोहोचले. विद्यार्थ्यांनी बंगल्याच्या परिसरात विविध खेळ खेळत आनंद लुटला व उत्साही वातावरण निर्माण झाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आयुक्त सरां समोर आपल्या स्वरचित कविता व प्रेरणादायी ओळी सादर केल्या. काही विद्यार्थ्यांनी शाळेत तयार केलेले डी.आय.वाय. विज्ञान प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले. तर काहींनी शालेय स्तरावर साकारलेल्या विविध कलाकृती, हस्तकला व ऐतिहासिक वस्तूंचे हस्तलिखित अल्बम सादर केले.
विद्यार्थ्यांनी कागदापासून तयार केलेली फुले, बुके तसेच नूतन वर्षाच्या शुभेच्छा पत्रांद्वारे आयुक्तांचे अभिनंदन केले. इयत्ता सातवीतील एका विद्यार्थिनीने आपल्या चित्रकलेद्वारे तयार केलेला आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांचा सुंदर फोटो भेट म्हणून सादर केला.
यावेळी आदरणीय श्री जय श्रीकांत सर व त्यांच्या कुटुंबीयांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली ,इयत्ता नववी व दहावीच्या मुलींनी तर मॅडम च्या  व त्यांच्या  मुलीच्या हातावर मेंहदी काढली. याप्रसंगी विद्यार्थिनीने सरांसमोर गीत सादर केले  आजचे विशेष प्रसंग म्हणजे इयत्ता आठवीचा एक विद्यार्थी शेख सादिक फारुख याने सरांना उर्दू कॅलिग्राफी मध्ये सरांचा नाव लिहून भेट म्हणून दिला होता सरांना तो खूप आवडला सरांनी तो नाव स्वतःच्या अक्षरात लिहून दाखवले  व स्वतःच्या नावात येणारे उर्दू अक्षरांच्या बारीकीने निरीक्षणही केले  इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी एक इंग्लिशची वन लेटर टू टेन लेटर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह वर्ड्स ऍक्टिव्हिटी सादर केली.
आजच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःही एक शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न रंगले आहे व शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे व आपल्या भविष्यामध्ये उंच भरारी घेण्याची एक नव चेतना निर्माण झाली आहे .
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून, भविष्यात प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.यावेळी सांगळे सर ,मुख्याध्यापक अबरार  सर , जुबेर सर, खुरत बाजी, नाझीया बाजी , आफ्रिन बाजी उपस्थित होते.

Thursday, December 18, 2025

पैशाअभावी गरीब समाजसेवक राजकारणा बाहेरच ?

पैशाअभावी गरीब समाजसेवक राजकारणा बाहेरच ?

मानवत / मुस्तखीम बेलदार

म्हणतात की समाजकारणातूनच व्यक्ती राजकारणात प्रवेश करते; मात्र सध्याच्या काळात सर्वसाधारण गरीब समाजसेवकाला राजकारणात खरोखर वाव मिळतो का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आज बहुतांश राजकीय पक्ष उमेदवाराच्या सामाजिक कार्याऐवजी त्याची आर्थिक क्षमता पाहूनच पक्षाचे तिकीट देत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
समाजसेवक हे निष्ठेने व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असतात. दिवस-रात्र, वेळ-अवेळी कोणालाही अडचण आली तर सर्वप्रथम हेच गरीब समाजसेवक मदतीसाठी पुढे येतात. रात्री-अपरात्री , रेशन, शासकीय कामे, आजारपण, अंत्यसंस्कार अशा विविध अडचणींमध्ये हेच समाजसेवक कोणताही मोबदला न घेता सर्वसामान्यांचे काम करून देतात
मात्र निवडणुकीच्या काळात लोकांना पैशाचा मोह सुटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक म्हणजे पैसा, अशीच मानसिकता तयार झाल्याने प्रामाणिक समाजसेवकांना डावलले जात असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून समाजासाठी झटणारे अनेक समाजसेवकही आता समाजसेवा करण्याबाबत धास्ती घेत असल्याचे जाणवत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये अनेक सर्वसाधारण गरीब समाजसेवकांनी निवडणूक लढवण्याऐवजी त्यापासून अलिप्त राहणे पसंत केले. कारण निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते आणि हा पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न सामान्य माणसासमोर उभा राहतो आहे.
जर ही च  परिस्थिती अशीच कायम राहिली, तर त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अडीअडचणीच्या वेळी मोठमोठे नेते कामी येत नसून, हेच गरीब समाजसेवक सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे मतदारांनी केवळ पैशाकडे न पाहता प्रामाणिक समाजसेवकांच्या कार्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Monday, December 8, 2025

ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला मानवत पोलिसांची कडक सुरक्षा

ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला मानवत पोलिसांची कडक सुरक्षा

मानवत / प्रतिनिधी 
मानवत नगरपरिषद निवडणुकीचा निकाल २१ जानेवारी रोजी जाहीर होणार असून, निकाल प्रक्रियेपर्यंत ईव्हीएम मशीनचे संरक्षण करण्यासाठी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन सीलबंद करून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.
या ठिकाणी मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच जिल्हा पोलिस दलातील दोन अधिकारी, १६ कर्मचारी तसेच SRPF चे ९ जवान देखील बंदोबस्तात कार्यरत आहेत. तसेच, कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्यावर क्षेत्रीय देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
स्ट्रॉंग रूम परिसरात मानवी बंदोबस्तासोबतच एकूण ८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसविण्यात आली असून २४ तास इलेक्ट्रॉनिक नजर ठेवली जात आहे. तहसील कार्यालय या परिसरात निवडणूक अधिकाऱ्यांशिवाय अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद केला आहे. प्रवेशासाठी ओळखपत्र तपासणी, सुरक्षा नोंदणी आणि तपासणी करण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, निकाल लागेपर्यंत सुरक्षा कोणत्याही परिस्थितीत सैल न ठेवता चोख राहणार आहे. ईव्हीएम मशीनची 'चेन ऑफ कस्टडी' अबाधित ठेवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असून यासाठी पोलिस दल पूर्ण सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Saturday, November 29, 2025

बिलाल मिलन व असलम बेलदार यांची निवडणूक प्रचारात आघाडी

बिलाल मिलन व असलम बेलदार यांची निवडणूक प्रचारात आघाडी

मानवत/प्रतिनिधी

मानवत शहरातील नामांकित उद्योजक ईणुसभाई मिलन यांचे सुपुत्र, युवा उद्योजक व सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असलेले बिलाल सेठ मिलन तसेच समाजसेवेत नेहमीच अग्रेसर राहिलेले अनीसभाई बेलदार यांचे सुपुत्र, युवानेते असलम बेलदार या दोघा उच्चशिक्षित युवकांवर विश्वास दाखवत शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष सईद उर्फ गब्बर खान व पॅनल प्रमुख बालाजी कुऱ्हाडे यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे विरोधकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आता निवडणुकीस काहीच दिवस शिल्लक असताना बिलाल मिलन व असलम बेलदार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत विकासाच्या आश्वासनांवर नागरिकांना मतदानाची विनंती ते करत आहेत.

यामुळे प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक चुरशीची बनली असून बिलाल मिलन व असलम बेलदार यांना युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Thursday, November 27, 2025

मानवत शहराला विकास निधी कमी पडू देणार नाही – खासदार श्रीकांत शिंदे


मानवत शहराला विकास निधी कमी पडू देणार नाही – खासदार श्रीकांत शिंदे

[] मानवत येथे शिवसेना–भाजप युतीची शक्तिप्रदर्शन सभा []

मानवत /  प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक  च्या पार्श्वभूमीवर शिवसेना–भाजप महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अंजली महेश कोक्कर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक २७ नोव्हेंबर रोजी मानवत शहराच्या मेन रोडवर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती .
सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष सईद उर्फ गब्बर खान, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंद भरोसे, पक्ष निरीक्षक आनंद जाधव व पॅनल प्रमुख बालाजी कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महायुतीतर्फे तयार करण्यात आलेल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सभेत आनंद भरोसे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अंजली महेश कोक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मानवत शहरातील विकासकामे वेगाने करण्यासाठी स्थिर सत्ता आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सौ. प्रेरणा वरपूडकर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही महायुतीचे भक्कम नेतृत्व, विश्वासार्ह विकासनियम व पारदर्शक प्रशासन यावर भाष्य करत नागरिकांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
मुख्य पाहुणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या प्रभावी भाषणात मानवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण पाठबळ देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
ते म्हणाले,महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मानवत शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, आरोग्य सुविधा, क्रीडा संकुल अशा सर्व पायाभूत सुविधांसाठी आवश्यक त्या सर्व निधीची कमतरता भासणार नाही. मानवतचा विकास ही आमची जबाबदारी आहे.
त्यांनी मानवत शहराला मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे आश्वासन देत मानवत शहराला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत नागरिकांना युतीच्या उमेदवारांना विजयासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
सभेला महिला, युवक, व्यापारी, विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मेन रोड दुमदुमला होता.
सभेनंतर मानवत शहरातील निवडणुकीची रंगत आणखी चढली असून प्रभागनिहाय चर्चा, मतदारसंघातील समीकरणे आणि युतीच्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

साथ सोबत निवासी अस्थिव्यंग विद्यालय मानवत येथे संविधान दिन उत्साहात साजरा

साथ सोबत निवासी अस्थिव्यंग विद्यालय मानवत येथे संविधान दिन उत्साहात साजरा
मानवत – प्रतिनिधी
साथ सोबत निवासी  अस्थिव्यंग विद्यालयात मानवत येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना संविधानाचे महत्त्व व त्यातील मूल्यांची सविस्तर माहिती दिली.
या निमित्त शाळेत रंगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने व सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सोफिया मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन साजिद सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मानवत युवा पॅंथर च्या वतीने भारतीय  संविधान दिन उत्साहात साजरा

मानवत युवा पॅंथर च्या वतीने भारतीय  संविधान दिन उत्साहात साजरा
मानवत प्रतिनिधी
विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांनी २ वर्षे११महिने १८ दिवस राबून या देशाच संविधान लिहिलं.रंकाला राजा बनण्याचा आणि बनवण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पतंगे साहेब(पोलीस उप निरीक्षक),शरीफ भाई(पोलीस नायक),लिपारे सर,घाटूळे सर,पैंजने सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलास खरात सर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले.बोलतांना ते पुढे म्हणाले की,या देशाच सार्वभौमत्व फक्त भारतीय संविधाना मुळेच टिकून आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक विलास खरात सर व युवा पॅंथरचे सन्माननीय पदाधिकारी  रविभाऊ पंडीत, नागसेन भदर्गे,दिपक ठेंगे, पप्पू गायकवाड,बिजू खरात, आकाश खंदारे,बाळा धबडगे आणि सर्व युवा पँथर्स मानवत, यांच्या सहकार्यातून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Tuesday, October 7, 2025

मानवत येथील शेख सत्तार बेलदार  यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर

मानवत येथील शेख सत्तार
बेलदार  यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक शेख सत्तार शेख सरवर बेलदार यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या  वतीने करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी नमाज-ए-जुमा नंतर परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष  सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक  मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शेख सत्तार शेख सरवर
बेलदार यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष  असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम  कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

Monday, October 6, 2025

मानवत येथील अब्दुल मुखीन यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर

मानवत येथील अब्दुल मुखीन यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक अब्दुल मुखीन अब्दुल खय्युम राज यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या  वतीने करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी नमाज-ए-जुमा नंतर परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष  सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक  मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अब्दुल मुखीन अब्दुल खय्युम  यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष  असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम  कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

मानवत येथील  शेख अब्दुल शमीम यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर

मानवत येथील  शेख अब्दुल शमीम यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक शेख अब्दुल शमीम अब्दुल रहेमान  राज यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या  वतीने करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी नमाज-ए-जुमा नंतर परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष  सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक  मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेख अब्दुल शमीम अब्दुल रहेमान  यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष  असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम  कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

मानवत येथील मोहम्मद युनुस यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर

मानवत येथील मोहम्मद युनुस यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक मोहम्मद युनुस शेख जमाल राज यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या  वतीने करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी नमाज-ए-जुमा नंतर परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष  सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक  मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोहम्मद युनुस शेख जमाल यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष  असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम  कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

मानवत येथील अनीस राज यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर

मानवत येथील अनीस राज यांना आदर्श पालक पुरस्कार जाहिर
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक तथा माजी नगरसेवक महम्मद अनीस महम्मद ईसाक राज यांची आदर्श पालक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ही घोषणा राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि राज यांच्या  वतीने करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण दिनांक २४ ऑक्टोबर २०२५  शुक्रवार रोजी नमाज-ए-जुमा नंतर परभणी येथील दरगाह रोडवरील मास्टर कॅफे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे
कार्यक्रमास आमदार राहुल पाटील , खासदार संजय उर्फ बंडु जाधव , बेलदार समाजाचे मार्गदर्शक सय्यद नजमुल हसन , मा. राज्यमंत्री सुरेश वरपुडकर ,कार्यकारी अध्यक्ष अब्दुल्ला राज , युवानेते वसीम बेलदार , बळीरामजी अरगडे ,जिल्हाध्यक्ष  सय्यद अबुजर हुसैनी , उपाध्यक्ष सय्यद विखार ईलाहि , महाराष्ट्र संघटक  मुस्तखीम बेलदार , समाजसेवक साजेद बेलदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अनीस राज यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मानवत तालुका अध्यक्ष  असीरखान ,उपाध्यक्ष महम्मद इद्रिस , सचिव शेख करिम  कोषाध्यक्ष महम्मद मुस्तकिम, सल्लागार सय्यद मोबीन राज तसेच सदस्य अय्युब राज, शेख ईस्माईल , शेख एजास ,मोहम्मद सुलतान मौलाना ,अब्दुल अजीस , अब्दुल अजीम , एकबाल राज आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

Sunday, August 31, 2025

मानवत येथील मोठा कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता व तुटलेला पूल बांधणार -  युवानेते डॉ. अंकुश लाड

मानवत येथील मोठा कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता व तुटलेला पूल बांधणार -  युवानेते डॉ. अंकुश लाड 
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौक परिसरातील मोठ्या कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता आणि तुटलेला पूल यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. अखेर या समस्येवर तोडगा निघत असून, रस्ता व पूल उभारणीची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन युवा नेते डॉ. अंकुश भाऊ लाड यांनी दिले आहे.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली समस्या
मोठ्या कब्रस्तानाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता. चिखलमय व खडबडीत रस्ता, तसेच मोडकळीस आलेला पूल यामुळे दफन विधीला जाणाऱ्यांना अपार त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर ही समस्या अधिकच भीषण होत होती.
डॉ. अंकुश भाऊ लाड यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांनी तातडीने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
अनेक सुविधा उभारण्याचे आश्वासन
डॉ. लाड यांनी सांगितले की ,मोठा कब्रस्तान परिसरात जाण्यासाठी दर्जेदार रस्ता तयार करण्यात येईल. तुटलेला पूल नवीन करण्यात येईल. तसेच शौचालय सुविधा, गट्टू पॉवर ब्लॉक सीसी रोड, परिसराचे सुशोभीकरण व नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटच्या टेबलांची उभारणी केली जाईल. ही सर्व कामे लवकरच पूर्ण होतील.
या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि मुस्लिम बांधवांनी स्वागत करत असून डॉ. अंकुश भाऊ लाड यांचे मनपूर्वक आभार मानले. या वेळी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

Tuesday, August 19, 2025

दर्गा रोड प्रभाग क्रमांक ११ मध्ये सय्यद अबरार ईलाही राज यांच्या उमेदवारीची जोरदार शक्यता 

परभणी महानगरपालिका प्रभाग क्र. ११ मध्ये नव्या नेतृत्वाची चाहूल

[] सय्यद अबरार ईलाही राज यांच्या उमेदवारीची जोरदार शक्यता []

परभणी (प्रतिनिधी) – परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राज बेलदार समाज सेवा मंडळाचे राज्य अध्यक्ष सय्यद अबरार ईलाही राज हे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. प्रभागातील नागरिक आणि विशेषतः राज बेलदार समाज बांधवांनी सय्यद अबरार ईलाही राज यांनी निवडणूक लढवावी यासाठी ठाम आग्रह धरला आहे.

सदर प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, लाईट्स आदी विकासकामे फारशी न झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकांमध्ये एक नवा पर्याय म्हणून सय्यद अबरार ईलाही राज यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

जनतेचा विश्वास, बदलाची अपेक्षा

सय्यद अबरार ईलाही राज हे समाजकारणात सक्रिय असून, राज बेलदार समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले गेले असून, ते एक अनुभवी, प्रामाणिक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की, "सय्यद अबरार ईलाही राज जर निवडून आले, तर प्रभागात खऱ्या अर्थाने विकासकामांना चालना मिळेल, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळेल, आणि भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभाराची सुरुवात होईल."

समर्थकांचा उत्साह, प्रचाराला सुरुवात

सध्या प्रभागात सय्यद अबरार ईलाही राज यांच्या समर्थनार्थ चर्चा, बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. युवक वर्ग,  आणि ज्येष्ठ नागरिक यांचाही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे समर्थक म्हणतात, "या वेळी आपल्याला बदल हवा आहे, आणि तो बदल सय्यद अबरार ईलाही राज यांच्या माध्यमातून निश्चितच घडेल."
प्रभागातील राजकीय समीकरणे हळूहळू स्पष्ट होत असून, सय्यद अबरार ईलाही राज यांच्या उमेदवारीने निवडणुकीत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Friday, August 15, 2025

डॉ.जगदीश शिंदे यांच्या "किंग्स मिसळ" हॉटेलचा आ. राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते शुभारंभ

डॉ.जगदीश शिंदे यांच्या "किंग्स मिसळ" हॉटेलचा आ. राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते शुभारंभ
मानवत  /  मुस्तखीम बेलदार

मानवत येथे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जगदीश शिंदे यांच्या "किंग्स मिसळ" या हॉटेलचा शुभारंभ पाथरी विधानसभा चे लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर यांच्या शुभहस्ते दिनांक १५  ऑगस्ट रोजी संपन्न झाला  यावेळी आमदार राजेश दादा विटेकर यांनी बोलताना डॉ. जगदीश शिंदे यांना नव्या व्यवसायिक वाटचालीसाठी  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच उत्तम चव, स्वच्छता आणि ग्राहकाभिमुख सेवा या ब्रीदवाक्यासह हे हॉटेल नक्कीच खाद्यप्रेमींच्या मनात स्थान मिळवेल, याची खात्री आहे असे आमदार राजेश दादा विटेकर म्हणाले.
याप्रसंगी मानवत नगरीचे युवानेते डॉ. अंकुश  भाऊ लाड, सभापती पंकजभैय्या आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, संचालक ज्ञानेश्वर मोरे, सुरज काकडे, अंबादास तूपसमुद्रे, गोपाळ सुरवसे, डॉ. सचिन कदम, आकाश राय ,संतोष लाडाने, अभिषेक आळसपुरे, सत्यशील धबडगे, स्वप्निल शिंदे उपस्थित होते.



विधीतज्ञ अमोल जोशी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

विधीतज्ञ अमोल जोशी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

मानवत  /  मुस्तखीम बेलदार

मानवत येथील सु प्रसिद्ध विधीतज्ञ अमोल जोशी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते डॉ. अकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर यांच्या शुभहस्ते दिनांक १५ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
यावेळी ॲड. अमोल जोशी यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी  युवा नेते डॉ. अंकुश भाऊ लाड, सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, संचालक ज्ञानेश्वर मोरे, सुरज काकडे, अंबादास तूपसमुद्रे, गोपाळ सुरवसे, नगर सेवक किरण बारहाते, सत्यशील धबडगे, स्वप्नील शिंदे, शिवाजी वरखडे, यांच्या सह शहरातील विधीज्ञ उपस्थित होते. 

विधीतज्ञ अमोल जोशी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

विधीतज्ञ अमोल जोशी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

मानवत  /  मुस्तखीम बेलदार

मानवत येथील सु प्रसिद्ध विधीतज्ञ अमोल जोशी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते डॉ. अकुश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश दादा विटेकर यांच्या शुभहस्ते दिनांक १५ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
यावेळी ॲड. अमोल जोशी यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी  युवा नेते डॉ. अंकुश भाऊ लाड, सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, संचालक ज्ञानेश्वर मोरे, सुरज काकडे, अंबादास तूपसमुद्रे, गोपाळ सुरवसे, नगर सेवक किरण बारहाते, सत्यशील धबडगे, स्वप्नील शिंदे, शिवाजी वरखडे, यांच्या सह शहरातील विधीज्ञ उपस्थित होते. 

Thursday, August 14, 2025

साथ सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

साथ सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
मानवत  /  मुस्तखीम बेलदार

मानवत येथील साथ सोबत निवासी अस्थी दिव्यांग विद्यालयात गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे चेअरमन श्री. इमरान अलीशा खान यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक गौरी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साजिद सर यांनी केले.

"हर घर तिरंगा" अभियानांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शाळेत रंगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. सोफिया मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Monday, August 11, 2025

सात सोबत निवासी अस्थी दिव्यांग  विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

सात सोबत निवासी अस्थी दिव्यांग  विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा
मानवत  /  मुस्तखीम बेलदार

मानवत येथील साथ सोबत निवासी  अस्थी दिव्यांग विद्यालयात रक्षाबंधनाचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपापसांत राखी बांधून भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण साजरा केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आपुलकी आणि समाधानाचे भाव दिसत होते.

या प्रसंगी मुख्याध्यापक घोरी सरांनी विद्यार्थ्यांना भाऊ-बहिणीच्या नात्याचे महत्त्व, रक्षाबंधनाचा इतिहास व सणाचे सामाजिक, सांस्कृतिक मूल्य याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी भावंडांमधील प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या रक्षणाची भावना नेहमी जपावी, असे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साजी सर, सोफिया मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याने वातावरणात आनंद, आपुलकी आणि उत्साहाची लहर पसरली. विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सणाचे महत्त्व व्यक्त केले आणि दिवस संस्मरणीय बनवला.

Saturday, July 26, 2025

तुळजाभवानी बँके तर्फे नरळद जि.प. शाळेतील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

तुळजाभवानी बँके तर्फे नरळद जि.प. शाळेतील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मानवत  /  मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथील जिल्हा परिषद शाळेत २६ जुलै रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माजलगाव यांच्या वतीने इयत्ता पहिलीच्या एकूण १९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत बँकेने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजा भवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक श्री. निवृत्ती निर्वळ हे होते तसेच नरळद जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंदू जैस्वाल, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. अशोकराव तिथे युवा कार्यकर्ते रंजित (भैया ) तुपसमुंद्रे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्यंकट माने आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते शाळेचे मुख्यध्यापक श्री. व्यंकट माने यांनी तुळजाभवानी बँकेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले या मुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागेल आणि त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार ही कमी होण्यास मदत होईल बँकेने दिलेले हे सहकार्य विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल असे असे मत यावेळी व्यक्त केले यावेळी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. निवृत्ती निर्वळ यांनी सांगितले कि बँक अशा उपक्रमासाठी नेहमीच प्रयत्नशील राहुन अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे यावेळी सांगण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील पहिलीच्या १९ विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल अशा शालेय वस्तूंचा समावेश असलेली शैक्षणिक किट वाटप करण्यात आले किट वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. निवृत्ती निर्वळ, लिपिक गिरीश मगर, यांचा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंदू जैस्वाल श्री. अशोकराव तिथे युवा कार्यकर्ते रंजित (भैया ) तुपसमुंद्रे, मुख्याध्यापक श्री. व्यंकट माने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक श्री. बालासाहेब पाते, श्री. संतोष शिंदे, श्री. प्रविण कदम, श्री. अक्षय राऊत यांच्या सह शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Saturday, June 21, 2025

राज - बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !

राज - बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !
  
२९ सप्टेंबर २०१७ हा दिवस राज व बेलदार समाजासाठी अत्यंत दुःखद ठरला. याच दिवशी राज बेलदार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, आणि ' राज बेलदार रत्न' या सन्मानाने गौरवलेले इंजिनिअर सय्यद अहमद साहेब यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज बेलदार समाज पोरखा झाला. त्यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून समाजाला संघटित केले, शिक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावर लढे दिले, आणि मागासलेल्या समाजासाठी नवे क्षितिज खुले केले.

सय्यद अहमद साहेब हे केवळ नेते नव्हते, तर ते समाजासाठी ध्येयवेडे कार्यकर्ते होते. समाजातील प्रत्येक घटकाला समविचारी आणि समभावाने त्यांनी आपले मानले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नव्हती. मात्र, त्यांच्या कार्याची धग आणि समाजसेवेची मशाल पुढे नेण्याचे कार्य आज सय्यद अबरार ईलाही करत आहेत.

सय्यद अबरार ईलाही हे समाजातील युवकांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आपल्या कार्यातून राज बेलदार समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. शिक्षण, आरोग्य, हक्कासाठी संघर्ष, युवकांना दिशा देणे, आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशा त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या कार्याची फलश्रुती समाजात दिसून येते आणि म्हणूनच आज त्यांचं नाव सय्यद अहमद साहेब यांचे खरे उत्तराधिकारी म्हणून समाजात घेतलं जात आहे.

ते केवळ साहेबांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत, तर त्यावर नवनवीन उपक्रमांची भर टाकत समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहेत. त्यांची तळमळ, समर्पण आणि निष्ठा पाहता राज बेलदार समाजातील अनेक ज्येष्ठ, तरुण, आणि महिला वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

सय्यद अबरार ईलाही यांचं कार्य हे सय्यद अहमद साहेब यांना खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली आहे. समाजात नेतृत्वाची गरज असतेच, पण त्याहून अधिक गरज असते कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या सेवाभावाची – आणि तो सेवाभाव सय्यद अबरार ईलाही यांच्यात निश्चितच आहे.

शब्दांकन ✍️ : मुस्तखीम बेलदार मानवत

बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !

बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !
  
२९ सप्टेंबर २०१७ हा दिवस बेलदार समाजासाठी अत्यंत दुःखद ठरला. याच दिवशी बेलदार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, आणि 'बेलदार रत्न' या सन्मानाने गौरवलेले इंजिनिअर सय्यद अहमद साहेब यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बेलदार समाज पोरखा झाला. त्यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून समाजाला संघटित केले, शिक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावर लढे दिले, आणि मागासलेल्या समाजासाठी नवे क्षितिज खुले केले.

सय्यद अहमद साहेब हे केवळ नेते नव्हते, तर ते समाजासाठी ध्येयवेडे कार्यकर्ते होते. समाजातील प्रत्येक घटकाला समविचारी आणि समभावाने त्यांनी आपले मानले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नव्हती. मात्र, त्यांच्या कार्याची धग आणि समाजसेवेची मशाल पुढे नेण्याचे कार्य आज सय्यद अबरार ईलाही करत आहेत.

सय्यद अबरार ईलाही हे समाजातील युवकांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आपल्या कार्यातून बेलदार समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. शिक्षण, आरोग्य, हक्कासाठी संघर्ष, युवकांना दिशा देणे, आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशा त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या कार्याची फलश्रुती समाजात दिसून येते आणि म्हणूनच आज त्यांचं नाव सय्यद अहमद साहेब यांचे खरे उत्तराधिकारी म्हणून समाजात घेतलं जात आहे.

ते केवळ साहेबांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत, तर त्यावर नवनवीन उपक्रमांची भर टाकत समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहेत. त्यांची तळमळ, समर्पण आणि निष्ठा पाहता बेलदार समाजातील अनेक ज्येष्ठ, तरुण, आणि महिला वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

सय्यद अबरार ईलाही यांचं कार्य हे सय्यद अहमद साहेब यांना खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली आहे. समाजात नेतृत्वाची गरज असतेच, पण त्याहून अधिक गरज असते कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या सेवाभावाची – आणि तो सेवाभाव सय्यद अबरार ईलाही यांच्यात निश्चितच आहे.

शब्दांकन ✍️ : मुस्तखीम बेलदार मानवत

Friday, June 20, 2025

न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू – जनतेसाठी मोठा दिलासा  

मानवत शहरातील न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू – जनतेसाठी मोठा दिलासा
  मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांच्या न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये आता आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अत्यंत आनंददायी व दिलासादायक बातमी असून शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे.
न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध असून त्यात आंतररुग्ण विभाग (IPD), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), बालरुग्ण अतिदक्षता विभाग (PICU), लसीकरण सुविधा, फोटोथेरपी, पल्स ऑक्सिमीटर व NIBP मॉनिटरिंग, व्हेंटिलेटर सेवा, एक्स-रे मशीन, सेंट्रल ऑक्सिजन इत्यादीचा समावेश आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार विनामूल्य मिळणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नावनोंदणी करून योजनांचा लाभ घेता येणार आहे.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक:
📞 89 83 77 69 95
📞 98 60 89 12 23
पत्ता अमरेश्वर मंदिराजवळ, कुटे कलेक्शनच्या वर, मेन रोड, मानवत, जिल्हा परभणी.
शहरातील जनतेने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू व्यंकटेश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे

डॉ. विठ्ठल काळे यांची प्रतिक्रिया – "गरीब व गरजू रुग्णांसाठी ही सेवा म्हणजे माझी सामाजिक बांधिलकी"

या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. विठ्ठल काळे म्हणाले,
"मानवत शहर व परिसरातील अनेक गरीब आणि गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे योग्य उपचार घेण्यात मागे पडतात. यामुळेच न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करून मोफत उपचार सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे केवळ वैद्यकीय सेवा नाही, तर माझी सामाजिक बांधिलकी आहे. गरजू रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, हीच माझी विनंती."
त्यांनी पुढे असेही नमूद केले की,
"हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असून अत्यवस्थ बालकांसाठी आवश्यक ती तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत तसेच भविष्यात बांधकाम कामगारांसाठी विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन हॉस्पिटलमध्येच दिले जाईल."
डॉ. काळे यांची ही भावना व सेवा वृत्ती नागरिकांमध्ये समाधान व विश्वास निर्माण करणारी आहे.

Thursday, June 19, 2025

कामगारांचे कैवारी टी. ई. कराड यांच्या कार्यामुळे कामगार समाधानी 

कामगारांचे कैवारी टी. ई. कराड यांच्या कार्यामुळे कामगार समाधानी 

परभणी / प्रतिनिधी
 अनुभवी सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांची नुकतीच परभणी जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे  या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध बांधकाम कामगार संघटनांनी व कामगारांनी त्यांच्या या नियुक्तीचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

टी. ई. कराड यांनी मागील अनेक वर्षांपासून कामगार हितासाठी मोठे योगदान दिले आहे. विशेषतः गेल्या ९ महिन्यांपासून त्यांनी परभणी येथे अतिरिक्त पदभार सांभाळत विविध कामगार समस्यांवर यशस्वीपणे काम केले आहे. २०१४ पासून अनेक वेळा त्यांनी अतिरिक्त पदभार सक्षमतेने पार पाडला असून, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.

कराड यांनी इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत, अनेक प्रलंबित अर्ज निकाली काढले आहेत. मोठ्या प्रमाणात निरक्षर असलेल्या बांधकाम कामगारांचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले, त्यामुळे वंचित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे.

त्यांच्या कार्यशैलीमुळे कामगारांचे प्रश्न लवकर निकाली लागल्याने, बांधकाम कामगार वर्ग समाधानी आहे. कराड यांच्या नियुक्तीमुळे परभणीतील कामगार हितसंबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास विविध संघटनांनी व कामगारांनी व्यक्त केला आहे.

शेख मोहम्मद अतिक कौसर यांची युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती


शेख मोहम्मद अतिक कौसर यांची युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती

पाथरी / प्रतिनिधी
युवासेना पाथरी विधानसभा क्षेत्रात नवीन नेतृत्वाच्या निवडीस चालना मिळत असताना, शेख मोहम्मद अतिक कौसर यांची पाथरी युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शिकवण व पक्षप्रमुख मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार  डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या सलग्न युवा सेना पाथरी उपशहर प्रमुख या पदी  
अमोल बाबासाहेब भाले पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख परभणी यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान
यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवडीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाचे काम अधिक गतीने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  शेख मोहम्मद अतिक कौसर यांना त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून शुभेच्छा मिळत आहे.

Friday, June 6, 2025

महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी  ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड

महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी  ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी  ज्ञानेश्वर ठोंबरे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे  प्रेमनगर आश्रम, राणीपूर, हरिद्वार,उत्तराखंड. येथे २८ जून ते १जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या पहिल्या १८ वर्षातील मुले/मुली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी मुलींच्या महाराष्ट्र संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.सदरील संघाची निवड चाचणी बालेवाडी क्रीडा संकुल येथे दिनांक १४ ते १८ जून  दरम्यान होणाऱ आहे.१८ वर्षा आतील मुले व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ही पहिल्यांदाच होत असून सदरील बहुमान हा परभणी जिल्ह्याला मिळाल्याबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा.आमदार श्री सुरेशराव वरपूडकर साहेब तसेच महाराष्ट्र असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री मंगलजी पांडे,प्रा.डॉ माधव शेजुळ, व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Monday, May 26, 2025

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत येथे प्रवेश प्रक्रिया सुरू – पालकांचा उत्तम प्रतिसाद

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत येथे प्रवेश प्रक्रिया सुरू – पालकांचा उत्तम प्रतिसाद
मानवत/ मुस्तखीम बेलदार
  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविनत्मता विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत येथे सन २०२५-२६ करिता एक वर्ष व दोन वर्ष कालावधीच्या विविध व्यवसायांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या संस्थेमध्ये विजतंत्री इलेक्ट्रिशियन , वायरमन, , फिटर, जोडारी, यंत्रकारागीर, आरेखक स्थापत्य, यात्रिक कृषित्र , वेल्डर यांसारख्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. एकूण १८४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थेचे निर्देशक शकिर हाशमी हे स्वयं उपस्थित राहून येणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणक्रमांची सविस्तर माहिती देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पालक आणि विद्यार्थी संस्थेतील प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक सजग होत असून संस्थेबाबत समाधान व्यक्त करत आहेत.

शासनमान्य अभ्यासक्रम, सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी प्रशिक्षक आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम यामुळे ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संधी ठरत आहे.

Monday, May 19, 2025

मानवत येथील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

मानवत येथील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
मानवत / मुस्तखीम बेलदार
 शेकडो नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत  मानवत शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन व कामाचा शुभारंभ युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न झाले. 
ज्यामध्ये रस्ता, नाली, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच लाईट पोल कामाची सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक याकरिता मागणी करत होते डॉ. अंकुश लाड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला व प्रत्यक्षात कामाचा श्रीगणेशा केला. याबद्दल सर्व नागरिकांनी युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांचे सत्कार करत  आभार मानले.

यावेळी आनंदमामा भदर्गे, अभिषेक आळसपुरे, नारायणराव धबडगे, सत्यशील धबडगे, राहुल भदर्गे, गणेशसेठ कुमावत, दत्तराव चौधरी, गणेशराव मोरे, सत्यशील धबडगे, श्रीधर कोक्कर, नांदुभाऊ कच्छवे, गणेशराव दहे,  करीम लाला कुरेशी, रशीद कुरेशी, हारून कुरेशी, शेख चांद, शेख सलीम, अल्ताफ कुरेशी, मुश्ताक कुरेशी, शकील कुरेशी, फारूक कुरेशी, खय्युमभाई बागवान, साजन टेलर, मेहबूबभाई मन्सूरी, समीर सय्यद, हसन शेख, मुजीब कुरेशी, शेख मन्नू, शेख कलीम, मोहसीन शेख, शेख लालू, मतीन काझी, अनिस कुरेशी, नासिर राज, अशीर राज, रियाज कुरेशी, नदीम कुरेशी, इलाही कुरेशी, पपू गायकवाड, विशाल ढापसे, अभिमानराव धबडगे, लहू मामा, रवी वाघमारे, हरिभाऊ चटाले, अनिल घाटुळ उपस्थित होते.

Monday, May 12, 2025

मानवत येथील जमजम कॉलनीत नवीन पाईपलाईनचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन

मानवत येथील जमजम कॉलनीत नवीन पाईपलाईनचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन

मानवत /  मुस्तखीम बेलदार
प्रभाग क्रमांक ७ मधील जमजम कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासत होती. ही गंभीर बाब स्थानिक नागरिकांनी युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्वरीत पुढाकार घेत आज जमजम कॉलनीमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ केला या महत्त्वपूर्ण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
जमजम कॉलनीसह संपूर्ण बांगर प्लॉट परिसरात महिलांना व वयोवृद्धांना पाण्यासाठी लांब अंतर प्रवास करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. लाड यांनी लवकरच पाईपलाईनच्या माध्यमातून घराघरांत पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. या उद्घाटन सोहळ्यावेळी त्यांनी परिसरात लवकरच विद्युत खांबही बसवले जातील, असे आश्वासन दिले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. लाड यांनी सांगितले की, बांगट प्लॉट, राज गल्ली, गालिब नगर आणि आंबेगाव नाका या परिसरांमध्ये पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सय्यद जमील, माजी नगरसेवक नियमत खान, अफसर अंसारी, अनंद मामा भदर्गे, हबीब भडके आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय हाजी रफिक कुरेशी, नूरभाई कुरेशी, फयाम बेलदार, करीम बेलदार, रफिक भाई कुरेशी टेकडी वाले, शेख बडे मिया, बाबू फूप्फा, इब्राहिम भाई, शेख बाबूभाई, सय्यद समीर, सिराज मदनी, रफिक शेख, शफी सफारी टेलर अन्सारी,इलियास पठाण, शिरूभाई, माजिद शेख, अब्दुल वाहब कुरेशी, सिद्दीक भाई ड्रायव्हर,करीम मामू मिर्झा अगु भाई यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, May 10, 2025

मानवत येथील शिवसेना नेते बालाजी कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मानवत येथील शिवसेना नेते बालाजी कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
[] वाढदिवसानिमित वृद्धाश्रमात वृद्धांना केले फळवाटप  []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा समाजसेवक , शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे समर्थक बालाजी कुराडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमासह मोठ्या उत्साहात दि.९  मे रोजी साजरा करण्यात आला.
युवा नेते बालाजी कुराडे यांनी वृद्धाश्रमात आपल्या वाढदिवसाच्या या खास दिवशी त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन प्रेमळ भेट देत वृद्धांना फळवाटप केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला
आश्रमातील प्रत्येक चेहऱ्यावर यावेळी हास्य उमटले होते.
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बालाजी कुराडे यांना वाढदिवसा निमित्त शाल व हार घालून शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात ढोल ताशे च्या गजरात नागरीकांनी बालाजी कुराडे यांचे जंगी स्वागत करत वाढदिवस साजरा केला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील स्थानिक नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था नी  बालाजी कुराडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहे.






Friday, May 9, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानवत दौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानवत दौरा 
[] शिवसेना नेते बालाजी कुऱ्हाडे यांच्या निवासस्थानी देणार भेट []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
शिवसेनेचे नेते तथा माजी नगरसेवक बालाजी  कुऱ्हाडे यांच्या मानवत येथील निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ मे रोजी  भेट देणार असल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली ११ मे रोजी पाथरी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे आधी मानवतला येणार असून, ते थेट रचना कोलोनी येथील माजी नगरसेवक शिवसेनेचे नेते बालाजी कुऱ्हाडे यांच्या घरी भेट देतील. तसेच आरोग्य शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे  या भेटीला अनन्यसाधारण राजकीय महत्त्व असून, नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.
स्थानिक पातळीवर बालाजी कुऱ्हाडे यांचा प्रभाव लक्षात घेता ही भेट राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारी ठरू शकते, असा तर्क लावला जात आहे. शहरात शिंदे गटाच्या हालचालींना वेग आला असून, पक्ष बळकट करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण रणनीती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

यावेळी शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सुरक्षा यंत्रणांनीही आवश्यक तयारी केली आहे.
मानवत शहरातील राजकीय वातावरण तापले असून, नागरिक, कार्यकर्ते आणि विरोधकही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.

Thursday, April 3, 2025

मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड

मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
ग्रामीण भागातून मानवत शहरात येणाऱ्या महिला आणि शहरातील माता-भगिनींसाठी लवकरच सुविधायुक्त सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मानवत शहराचे युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

महिलांना शहरात येताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यामध्ये शौचालयाच्या अपुऱ्या सुविधांमुळे होणारा त्रास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या समस्येच्या स्थायी समाधानासाठी लवकरच नियोजन करून आवश्यक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येतील, असे डॉ. लाड यांनी स्पष्ट केले.

तसेच, महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आधुनिक शौचालयांची उभारणी करून त्या ठिकाणी योग्य स्वच्छतेची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लवकरच यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Monday, March 31, 2025

शेक हॅन्डचा रमजान ईद निमित्त सामाजिक योगदान!

शेक हॅन्डचा रमजान ईद निमित्त सामाजिक योगदान
[] निराधार महिलेस स्वावलंबी बनवण्यासाठी  दिली गिरणी भेट []

मानवत / मुस्तखीम बेलदार
शेक हॅन्ड संस्थेने रमजान ईदच्या पवित्र पर्वावर सामाजिक कार्याचा एक नवीन आदर्श प्रस्तुत केला आहे. संस्थेने इशरत बी शेख मोहिद्दीन यांना पीठ व दाळ तयार करण्यासाठी गिरणी भेट देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इशरत शेख यांच्या पतीचे आजाराने निधन झाले असून, त्यांना तीन अपत्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत अवघड आहे, कारण त्यांच्याकडे घर, जमीन किंवा इतर संपत्ती नाही. रोज मरणासन्न मजुरी करून त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.

इशरत शेख यांचे मूळ गाव सुरपिंपरी आहे आणि त्या सध्या मानवत येथे राहत आहेत. त्यांचे तीन अपत्य, शेख शाहिद, सुमैय्या बी, आणि शेख सय्यद यांचा शिक्षणासाठी संघर्ष करत आहेत. इशरत यांना एक नवा रोजगार सुरू करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती, म्हणून शेक हॅन्ड संस्थेने रमजान ईदच्या निमित्ताने त्यांना पीठ आणि डाळ तयार करण्यासाठी गिरणी भेट दिली. यामुळे त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला सुधारू शकतील आणि स्वावलंबी होऊ शकतील.

या कार्यक्रमासाठी शेक हॅन्ड संस्थेच्या अर्चना भारस्वाडकर, वैभव ठाकूर, शाम गाडेकर, छाया गायकवाड, रत्नमाला बेले, मुंजाभाऊ शिळवने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. या वेळी मानवत येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असद खान, छाया गायकवाड, प्रियंका दुमाणे, श्री नेवरीकर सर तसेच शेक हॅन्ड चे परमेश्वर सिराळ, शरद लोहट यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

शेक हॅन्ड संस्थेचे हे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले असून, त्यांनी सामाजिक जबाबदारी पार केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे मानवत परिसरात नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Friday, March 28, 2025

मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध

मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध
मानवत/ मुस्तखीम बेलदार
जुमा तुल विदा म्हणजे रमजान महिण्याचा शेवटचा शुक्रवार या दिवशी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनाल लॉ बोर्ड ने देशभरात वकफ संशोधन विधेयक २०२४ च्या विरुद्ध निषेध म्हणून शुक्रवार च्या नमाजा मध्ये हाताला काळी पट्टी बाधुन नमाज पढुन वकफ बिलाचा विरोध मौन प्रदषण करण्याचे आवाहान केले होते या साठी वक्फ संशोधन विधेयक २०२४ विरोधात मानवत येथील मुस्लीम बांधवानी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. हे विधेयक वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल सुचवते, ज्यामुळे  मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी त्याचा विरोध केला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) आरोप केला आहे की हे विधेयक देशभरातील वक्फ संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे. त्यांनी संयुक्त संसदीय समितीवर (JPC) काम ईमानदारीने न केल्याचा आरोपही केला आहे. 
जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी यांनीही विधेयकाची टीका केली आहे, असे सांगत की हे मुस्लिम समुदायासाठी स्वीकारार्ह नाही आणि वक्फ संपत्तीच्या स्वायत्ततेला कमी करते. विधेयकाच्या तरतुदींमध्ये वक्फ संपत्तीवरील अतिक्रमण, वक्फ निधीचा दुरुपयोग, आणि आवश्यक माहिती न देणे यांसाठी नवीन अपराध आणि त्यानुसार दंडांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, वक्फ संपत्तीवर अवैध कब्जा केल्यास २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. केंद्र सरकारने विधेयकात १४ बदल मंजूर केले असून, विरोधी पक्षांचे ४४ प्रस्ताव नाकारले आहेत. या बदलांमध्ये वक्फ बोर्डामध्ये गैर-मुस्लिम सदस्यांची नियुक्ती, वक्फ संपत्तीच्या नोंदणीसाठी वेळेची मर्यादा, आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका वाढवणे यांचा समावेश आहे. 
या पार्श्वभूमीवर, मानवत येथील नागरिकांनी काळ्या फिती लावून या विधेयकाचा विरोध दर्शविला आहे, ज्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा आणि चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

Friday, February 14, 2025

वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान 

वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान 
मानवत प्रतिनिधी
वजुर खुर्द येथील गट क्रमांक १६ मध्ये विठ्ठल तातेराव वावडे या शेतकऱ्याचे शेतात १२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने सोलारचे मोठे नुकसान झाले आहे.
विठ्ठल तातेराव वावडे  शेतकरी यांचे१२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने  सौर ऊर्जा कृषी पंप सोलार चे पाच पाट्या पूर्ण निकामी झाली आहे यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या संबंधी त्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी ती मागणी करत आहे.

Monday, February 3, 2025

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
मानवत,/प्रतिनिधी 
येथील राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अकरावी व बारावीतील वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले होते यात सकाळ-सत्रामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर अंकुश भाऊ लाड अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांत लिंग काळे प्रमुख अतिथी रितेश भैया काळे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी मुख्य मार्गदर्शक श्री बजरंग ग्रीडा शिक्षण विस्तार अधिकारी मानवतप्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी आत्माराम कुठे  दत्ताभाऊ चौधरी नगरसेवक मानवत  श्री किसन भिसे अध्यक्ष स्पोर्ट अकॅडमी मानवत काशिनाथ शिंदे संचालक समाज प्रबोधन संस्था पात्री लक्ष्मण पाठक प्राचार्य महात्मा बसेश्वर कनिष्ठ महाविद्यालय रामटाकळी तसेच सत्यशील धबडगे दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी मानवत उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक अंकुश भाऊ लाड यांनी मानवत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्तेची गरज असून शैक्षणिक कार्यासाठी व मानवत शहराच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न शील असून शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मानवत शहरांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानवत शहर हे शिक्षणाचे माहेरघर झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बजरंग गिलडा यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेयरणादायी गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत घेतली तर विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होतो यासाठी अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले 
तसेच ग्रामीण कवी आत्माराम कुठे यांनी उत्कृष्ट अशा देशभक्तीपर सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानावर कविता सादर केल्या माय बापावर प्रेम करा ही कविता सादर केली प्रेमावर कविता करून तरुणांची मने जिंकलीशेतकरी दादा तुला दलाला लुटलं या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर हास्यविनोद करून कार्यक्रमात रंगत आणत विद्यार्थ्यांची मनी जिंकली मानवत शहरातील राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांनी मानवत चे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकवले अशा गौरी दहे आरती चव्हाण व संध्या पिंपळेया विद्यार्थिनीचा युवानेते डॉ अंकुश भाऊ लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मानवत शहरातील निर्भया पथक प्रमुख शकुंतला ताई चणे यांचा प्राचार्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी अध्यक्ष समारोप करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात त्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष शांत लिंग काळे यांनी सांगितले या कार्यक्रमात आनंद नांदगावकर सर यांनी काढलेल्या स्नेहसंमेलनाच्या उत्कृष्ट रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भगवान घाटूळ यांनी तर सूत्रसंचालन गोविंद रासवे सर यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य शिवशक्ती कुकडे मॅडम यांनी केले 
यानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व दुपार सत्राला सुरुवात झाली याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळी लावणी लोकगीत कथक नृत्य पोवाडा शाहिरी अशा विविध कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या तसेच शेलापागोटे व संगीत शेलापागोटेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच प्राध्यापक संतोष पवार यांनी केलेल्या अनेक शेरोशायरी मधून कार्यक्रमाला रंगत आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत जोजारे कुरेशी सर काशिनाथ जाधव यांनी केलेआणि शेवटी संगीतावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनसोक्त डान्स करत आनंद घेतला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांती लिंग काळे सर यांनी विद्यालयातील उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिवशक्ती कुकडे प्रा संतोष पवार प्रा  भगवान घाटूळ गोविंद रासवे गोविंद पाटील प्रा अनुसया काळे दैवशाला शिरसागर सुनिता शिंदे  प्रा शिवराज गिराम प्रा गजानन चौरे प्रा मुंजाजी कांबळे प्रवीण पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.