Saturday, June 21, 2025

राज - बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !

राज - बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !
  
२९ सप्टेंबर २०१७ हा दिवस राज व बेलदार समाजासाठी अत्यंत दुःखद ठरला. याच दिवशी राज बेलदार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, आणि ' राज बेलदार रत्न' या सन्मानाने गौरवलेले इंजिनिअर सय्यद अहमद साहेब यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज बेलदार समाज पोरखा झाला. त्यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून समाजाला संघटित केले, शिक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावर लढे दिले, आणि मागासलेल्या समाजासाठी नवे क्षितिज खुले केले.

सय्यद अहमद साहेब हे केवळ नेते नव्हते, तर ते समाजासाठी ध्येयवेडे कार्यकर्ते होते. समाजातील प्रत्येक घटकाला समविचारी आणि समभावाने त्यांनी आपले मानले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नव्हती. मात्र, त्यांच्या कार्याची धग आणि समाजसेवेची मशाल पुढे नेण्याचे कार्य आज सय्यद अबरार ईलाही करत आहेत.

सय्यद अबरार ईलाही हे समाजातील युवकांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आपल्या कार्यातून राज बेलदार समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. शिक्षण, आरोग्य, हक्कासाठी संघर्ष, युवकांना दिशा देणे, आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशा त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या कार्याची फलश्रुती समाजात दिसून येते आणि म्हणूनच आज त्यांचं नाव सय्यद अहमद साहेब यांचे खरे उत्तराधिकारी म्हणून समाजात घेतलं जात आहे.

ते केवळ साहेबांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत, तर त्यावर नवनवीन उपक्रमांची भर टाकत समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहेत. त्यांची तळमळ, समर्पण आणि निष्ठा पाहता राज बेलदार समाजातील अनेक ज्येष्ठ, तरुण, आणि महिला वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

सय्यद अबरार ईलाही यांचं कार्य हे सय्यद अहमद साहेब यांना खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली आहे. समाजात नेतृत्वाची गरज असतेच, पण त्याहून अधिक गरज असते कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या सेवाभावाची – आणि तो सेवाभाव सय्यद अबरार ईलाही यांच्यात निश्चितच आहे.

शब्दांकन ✍️ : मुस्तखीम बेलदार मानवत

बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !

बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !
  
२९ सप्टेंबर २०१७ हा दिवस बेलदार समाजासाठी अत्यंत दुःखद ठरला. याच दिवशी बेलदार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, आणि 'बेलदार रत्न' या सन्मानाने गौरवलेले इंजिनिअर सय्यद अहमद साहेब यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बेलदार समाज पोरखा झाला. त्यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून समाजाला संघटित केले, शिक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावर लढे दिले, आणि मागासलेल्या समाजासाठी नवे क्षितिज खुले केले.

सय्यद अहमद साहेब हे केवळ नेते नव्हते, तर ते समाजासाठी ध्येयवेडे कार्यकर्ते होते. समाजातील प्रत्येक घटकाला समविचारी आणि समभावाने त्यांनी आपले मानले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नव्हती. मात्र, त्यांच्या कार्याची धग आणि समाजसेवेची मशाल पुढे नेण्याचे कार्य आज सय्यद अबरार ईलाही करत आहेत.

सय्यद अबरार ईलाही हे समाजातील युवकांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आपल्या कार्यातून बेलदार समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. शिक्षण, आरोग्य, हक्कासाठी संघर्ष, युवकांना दिशा देणे, आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशा त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या कार्याची फलश्रुती समाजात दिसून येते आणि म्हणूनच आज त्यांचं नाव सय्यद अहमद साहेब यांचे खरे उत्तराधिकारी म्हणून समाजात घेतलं जात आहे.

ते केवळ साहेबांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत, तर त्यावर नवनवीन उपक्रमांची भर टाकत समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहेत. त्यांची तळमळ, समर्पण आणि निष्ठा पाहता बेलदार समाजातील अनेक ज्येष्ठ, तरुण, आणि महिला वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

सय्यद अबरार ईलाही यांचं कार्य हे सय्यद अहमद साहेब यांना खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली आहे. समाजात नेतृत्वाची गरज असतेच, पण त्याहून अधिक गरज असते कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या सेवाभावाची – आणि तो सेवाभाव सय्यद अबरार ईलाही यांच्यात निश्चितच आहे.

शब्दांकन ✍️ : मुस्तखीम बेलदार मानवत

Friday, June 20, 2025

न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू – जनतेसाठी मोठा दिलासा  

मानवत शहरातील न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू – जनतेसाठी मोठा दिलासा
  मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांच्या न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये आता आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अत्यंत आनंददायी व दिलासादायक बातमी असून शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे.
न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध असून त्यात आंतररुग्ण विभाग (IPD), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), बालरुग्ण अतिदक्षता विभाग (PICU), लसीकरण सुविधा, फोटोथेरपी, पल्स ऑक्सिमीटर व NIBP मॉनिटरिंग, व्हेंटिलेटर सेवा, एक्स-रे मशीन, सेंट्रल ऑक्सिजन इत्यादीचा समावेश आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार विनामूल्य मिळणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नावनोंदणी करून योजनांचा लाभ घेता येणार आहे.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक:
📞 89 83 77 69 95
📞 98 60 89 12 23
पत्ता अमरेश्वर मंदिराजवळ, कुटे कलेक्शनच्या वर, मेन रोड, मानवत, जिल्हा परभणी.
शहरातील जनतेने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू व्यंकटेश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे

डॉ. विठ्ठल काळे यांची प्रतिक्रिया – "गरीब व गरजू रुग्णांसाठी ही सेवा म्हणजे माझी सामाजिक बांधिलकी"

या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. विठ्ठल काळे म्हणाले,
"मानवत शहर व परिसरातील अनेक गरीब आणि गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे योग्य उपचार घेण्यात मागे पडतात. यामुळेच न्यू व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करून मोफत उपचार सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे केवळ वैद्यकीय सेवा नाही, तर माझी सामाजिक बांधिलकी आहे. गरजू रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, हीच माझी विनंती."
त्यांनी पुढे असेही नमूद केले की,
"हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असून अत्यवस्थ बालकांसाठी आवश्यक ती तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत तसेच भविष्यात बांधकाम कामगारांसाठी विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन हॉस्पिटलमध्येच दिले जाईल."
डॉ. काळे यांची ही भावना व सेवा वृत्ती नागरिकांमध्ये समाधान व विश्वास निर्माण करणारी आहे.

Thursday, June 19, 2025

कामगारांचे कैवारी टी. ई. कराड यांच्या कार्यामुळे कामगार समाधानी 

कामगारांचे कैवारी टी. ई. कराड यांच्या कार्यामुळे कामगार समाधानी 

परभणी / प्रतिनिधी
 अनुभवी सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांची नुकतीच परभणी जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे  या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध बांधकाम कामगार संघटनांनी व कामगारांनी त्यांच्या या नियुक्तीचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

टी. ई. कराड यांनी मागील अनेक वर्षांपासून कामगार हितासाठी मोठे योगदान दिले आहे. विशेषतः गेल्या ९ महिन्यांपासून त्यांनी परभणी येथे अतिरिक्त पदभार सांभाळत विविध कामगार समस्यांवर यशस्वीपणे काम केले आहे. २०१४ पासून अनेक वेळा त्यांनी अतिरिक्त पदभार सक्षमतेने पार पाडला असून, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.

कराड यांनी इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत, अनेक प्रलंबित अर्ज निकाली काढले आहेत. मोठ्या प्रमाणात निरक्षर असलेल्या बांधकाम कामगारांचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले, त्यामुळे वंचित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे.

त्यांच्या कार्यशैलीमुळे कामगारांचे प्रश्न लवकर निकाली लागल्याने, बांधकाम कामगार वर्ग समाधानी आहे. कराड यांच्या नियुक्तीमुळे परभणीतील कामगार हितसंबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास विविध संघटनांनी व कामगारांनी व्यक्त केला आहे.

शेख मोहम्मद अतिक कौसर यांची युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती


शेख मोहम्मद अतिक कौसर यांची युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती

पाथरी / प्रतिनिधी
युवासेना पाथरी विधानसभा क्षेत्रात नवीन नेतृत्वाच्या निवडीस चालना मिळत असताना, शेख मोहम्मद अतिक कौसर यांची पाथरी युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शिकवण व पक्षप्रमुख मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार  डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या सलग्न युवा सेना पाथरी उपशहर प्रमुख या पदी  
अमोल बाबासाहेब भाले पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख परभणी यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान
यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवडीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाचे काम अधिक गतीने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  शेख मोहम्मद अतिक कौसर यांना त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून शुभेच्छा मिळत आहे.

Friday, June 6, 2025

महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी  ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड

महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी  ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी  ज्ञानेश्वर ठोंबरे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे  प्रेमनगर आश्रम, राणीपूर, हरिद्वार,उत्तराखंड. येथे २८ जून ते १जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या पहिल्या १८ वर्षातील मुले/मुली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी मुलींच्या महाराष्ट्र संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.सदरील संघाची निवड चाचणी बालेवाडी क्रीडा संकुल येथे दिनांक १४ ते १८ जून  दरम्यान होणाऱ आहे.१८ वर्षा आतील मुले व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ही पहिल्यांदाच होत असून सदरील बहुमान हा परभणी जिल्ह्याला मिळाल्याबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा.आमदार श्री सुरेशराव वरपूडकर साहेब तसेच महाराष्ट्र असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री मंगलजी पांडे,प्रा.डॉ माधव शेजुळ, व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.