बेलदार रत्न इंजि. सय्यद अहमद साहेब यांचे योग्य उत्तराधिकारी ' सय्यद अबरार ईलाही ' समाजकार्याच्या पायवाटेवर !
२९ सप्टेंबर २०१७ हा दिवस बेलदार समाजासाठी अत्यंत दुःखद ठरला. याच दिवशी बेलदार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, आणि 'बेलदार रत्न' या सन्मानाने गौरवलेले इंजिनिअर सय्यद अहमद साहेब यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बेलदार समाज पोरखा झाला. त्यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून समाजाला संघटित केले, शिक्षण व आरक्षणाच्या मुद्द्यावर लढे दिले, आणि मागासलेल्या समाजासाठी नवे क्षितिज खुले केले.
सय्यद अहमद साहेब हे केवळ नेते नव्हते, तर ते समाजासाठी ध्येयवेडे कार्यकर्ते होते. समाजातील प्रत्येक घटकाला समविचारी आणि समभावाने त्यांनी आपले मानले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नव्हती. मात्र, त्यांच्या कार्याची धग आणि समाजसेवेची मशाल पुढे नेण्याचे कार्य आज सय्यद अबरार ईलाही करत आहेत.
सय्यद अबरार ईलाही हे समाजातील युवकांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आपल्या कार्यातून बेलदार समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. शिक्षण, आरोग्य, हक्कासाठी संघर्ष, युवकांना दिशा देणे, आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशा त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या कार्याची फलश्रुती समाजात दिसून येते आणि म्हणूनच आज त्यांचं नाव सय्यद अहमद साहेब यांचे खरे उत्तराधिकारी म्हणून समाजात घेतलं जात आहे.
ते केवळ साहेबांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत, तर त्यावर नवनवीन उपक्रमांची भर टाकत समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहेत. त्यांची तळमळ, समर्पण आणि निष्ठा पाहता बेलदार समाजातील अनेक ज्येष्ठ, तरुण, आणि महिला वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
सय्यद अबरार ईलाही यांचं कार्य हे सय्यद अहमद साहेब यांना खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली आहे. समाजात नेतृत्वाची गरज असतेच, पण त्याहून अधिक गरज असते कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या सेवाभावाची – आणि तो सेवाभाव सय्यद अबरार ईलाही यांच्यात निश्चितच आहे.
शब्दांकन ✍️ : मुस्तखीम बेलदार मानवत
No comments:
Post a Comment