Saturday, October 12, 2024

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आमदार राजेश दादा  विटेकर

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आमदार राजेश दादा  विटेकर
[] ९ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन []

मानवत/मुस्तखीम बेलदार
 शहरांच्या विकासात मानवत नगरपालिका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे  प्रतिपादन आ. विटेकर यांनी केले. शनिवार १२ ऑक्टो. रोजी ११ वाजता दसऱ्याच्या मुहूर्तावर जुन्या तहसीलच्या जागेवर नगरपालिकेच्या नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. 
  नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश विटेकर स्वतः होते. तर विचार मंचावर ह भ प १००८ मनीषानंद पुरीजी महाराज, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, विजयकुमार कत्रुवार, विकासशील युवा नेतृत्व डॉ. अंकुश लाड, सुरेश काबरा, माजी नगराध्यक्ष एस. एन. पाटील, संजयकुमार लड्डा, गिरीश कत्रुवार आदी होते. पुढे बोलताना विटेकर म्हणाले, पाथरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत मानवत नगरपालिका सर्वात पुढे आहे. मागील काळात आपण मानवत नगरपालिकेला कधीही निधी कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. हा शब्द पूर्ण करत आपण दोन महिन्याच्या काळात वीस कोटी पक्षा जास्त निधी  मानवत नगरपालिकेला दिला आहे. पुढच्या काळातही विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी विजयकुमार कत्रुवार व ह.भ.प. १००८ मनीषानंद पुरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत, बालाजी कुऱ्हाडे,  दत्ता चौधरी, मोहन लाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, प्रा. अरविंद घारे, सचिन कोक्कर ,नजीर विटेकर यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, अभियंता, व्यावसायिक, व्यापारी, न.प. कर्मचारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अनिरुद्ध पांडे यांनी तर संचालन किशोर तुपसागर यांनी केले. 

[] विकासाचा रथ अव्याहत धावणार - डॉ. अंकुश लाड 
          नूतन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना युवानेते डॉ. अंकुश लाड म्हणाले विकासाचा रथ अव्याहतपणे धावणार आहे. तरुण व्यापारी व व्यवसायिकांसाठी शहरामध्ये अद्ययावत व्यापारी संकुलाची गरज होती.  तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी बरोबरच व्यापार-व्यवसाय वाढण्याची आवश्यकता होती. मानवतची बाजारपेठ एका मुख्य रस्त्यावरच उभारलेली असल्याने बाजारपेठेचे विकेंद्रीकरणही होणे गरजेचे होते. एकाच रस्त्यावर पूर्ण बाजारपेठे असल्यामुळे विशेषतः बाजाराच्या दिवशी संपूर्ण रस्ता रहदारीसाठी जाम होत होतो. याच रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट शाखा व व्यापारी दुकाने आहेत. मात्र वाहन पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था नाही. नवीन होणाऱ्या व्यापारी संकुलात २८ गाळे हे तळमजल्यावर, पाहिल्या मजल्यावर ६ गाळे  व  १६०० चौरस फूट मध्ये विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांसाठी अद्यावत असे वाचनालय होणार आहे. याशिवाय या संकुलात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असणार आहे. या संकुलामुळे व्यापार वाढण्यास मदत होईल. एवढ्या दुकानांवर भागणार नाही याची मला जाणीव आहे. यापुढेही नवीन व्यापारी संकुले उभी करून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करू. या बरोबरच काही राष्ट्रीयकृत बँकेसोबत करार करून बँकांनाही या ठिकाणी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आ. राजेश दादा विटेकर

शहरांच्या विकासात मानवत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर - आ. राजेश दादा विटेकर

[] ९ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या व्यापारी संकुलाचे उदघाटन  []

मानवत/मुस्तखीम बेलदार 
शहरांच्या विकासात मानवत नगरपालिका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे  प्रतिपादन आमदार राजेशदादा विटेकर यांनी केले. शनिवार १२ ऑक्टो. रोजी ११ वाजता दसऱ्याच्या मुहूर्तावर जुन्या तहसीलच्या जागेवर नगरपालिकेच्या नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. 
      नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश विटेकर स्वत होते. तर विचार मंचावर ह भ प १००८ मनीषानंद पुरीजी महाराज, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, विजयकुमार कत्रुवार, विकासशील युवा नेतृत्व डॉ. अंकुश लाड, सुरेश काबरा, माजी नगराध्यक्ष एस. एन. पाटील, संजयकुमार लड्डा, गिरीश सेठ कत्रुवार आदी होते. पुढे बोलताना विटेकर म्हणाले, पाथरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत मानवत नगरपालिका सर्वात पुढे आहे. मागील काळात आपण मानवत नगरपालिकेला कधीही निधी कमी पडून देणार नसल्याचे म्हटले होते. हा शब्द पूर्ण करत आपण दोन महिन्यात वीस कोटी पेक्षा जास्त निधी  मानवत नगरपालिकेला दिला आहे. पुढच्या काळातही विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी विजयकुमार कत्रुवार व ह.भ.प. १००८ मनीषानंद पुरीजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत, बालाजी कुऱ्हाडे, दत्ता चौधरी, मोहन लाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, प्रा. अरविंद घारे, सचिन कोक्कर यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, व्यापारी, नप कर्मचारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अनिरुद्ध पांडे यांनी तर संचालन किशोर तूपकर केले. 

Tuesday, October 8, 2024

आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये - वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिक हुसेन शेख

आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये - वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिक हुसेन शेख

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत ग्रामीण रुग्णालयात गेल्या आठवड्यात नूतन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. आशिक हुसेन शेख हे रुजू झाले आहेत.  रुजू झाल्यापासून गेल्या आठ दिवसापासून रुग्णालयाचा कारभार ते सांभाळत आहेत .८ ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली.  या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये असे आवाहन त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. गेल्या १३ वर्षांपासून मानवत ग्रामीण रुग्णालयात  वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नरेंद्र वर्मा हे कर्तव्यावर होते.  नुकतेच शासनाकडून त्यांची बदली होऊन त्यांना स्त्री रुग्णालय परभणी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले.  त्यांच्या जागेवर मानवत येथे डॉ. आशिक हुसेन शेख हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातून आले.  ८ दिवसापूर्वी रुजू झाल्यानंतर पूर्ण रुग्णालयाचे कामकाजाची त्यांनी पाहणी केल्यानंतर ८  ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली.  या आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात बदल करण्याची गरज असून आरोग्य सेवा पुरवताना कोणत्याही  प्रकारचा कसूर करू नये असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आरोग्य बाबतीत आहेत त्या तळागाळातील माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.  त्याची व्यवस्थित अंमलबजावणी  आली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिक हुसेन शेख यांच्या समवेत रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय नाईक , कार्यालयीन अधीक्षक संजय जोशी , वैद्यकीय अधिकारी डॉ.  तेजा पाटील , युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. कलीम शेख , राष्ट्रीय बाळ स्वस्थ अधिकारी डॉ. ललित कोकरे,  डॉ.  सुषमा भदर्गे,  डॉ. प्रीती दीक्षित यांच्या सह औषध निर्माण अधिकारी शितल गायकवाड , मीनाक्षी कदम , इन्चार्ज अधिपाचारिका  शिला पाटील , शुभांगी जोशी , रेखा फुलमोगरे, शिवप्रिया सोगे , प्रज्ञा जगझाप , लक्ष्मी सोनवणे , एकात्मिक सल्ला व केंद्र चे राजु कच्छवे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ  नरेंद्र टोम्पे , कपिल भरड , आरोग्य सेवक अकबर पठाण ,क्ष किरण अधिकारी विष्णू टेकाळे  अधिपरीसेवीका रत्नमाला दाभाडे,  रेणुका गिराम , सारिका आखाडे , एन ची डी विभागाचे करुणा ढेपे , बालिका सुरवसे ,  दीक्षा गायकवाड ,निशा वाकळे , राष्ट्रीय बालस्वस्थ फार्मासिस्ट सचिन कदम , सुनील खरात ,शुभम करवलकर ,ज्ञानेश्वर माकुडे ,बजरंग ढवळे ,मोहन कागडा , विठ्ठल धोपटे , रमेश लेंगुळे ,  कपिल सोनटक्के , महादेव पोटे , शैलेश उघडे,  दीपक कुमावत व सुमित लाड आदी कर्मचारी उपस्थित होते.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना दिलेला शब्द पूर्ण; दोन कोटि रुपयाचे भव्य  सभागृह बांधकामाचा शुभारंभ - युवानेते  डॉ. अंकुश लाड

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना दिलेला शब्द पूर्ण; दोन कोटि रुपयाचे भव्य  सभागृह बांधकामाचा शुभारंभ - युवानेते  डॉ. अंकुश लाड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथील आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सर्व साधकाना  त्यांच्या  सोयीसाठी मानवत शहारत मोठे सभागृह उभारू असे आश्वासन युवानेते  डॉ. अंकुश लाड यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी  दिले होते. तो दिलेला शब्द पूर्ण करीत ७ ऑक्टो रोजी शहरातील वाघेश्वर नगर परिसरात   मानवत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारासाठी २०० लक्ष रुपयाचे भव्य असे सभागृह बांधकामाचा शुभारंभ गुरूपूरजनेने करण्यात आला.
   सद्या  मानवत शहरात शेकडो साधक असून त्यांना दैनंदिन योग साधना व विविध शिबीर आणि भजन करण्यासाठी जागेची अडचण आहे. याकरीता आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी जागा उपलब्ध करून देऊन सभागृह निर्माण करून द्यावे अशी मागणी केली.यावेळी डॉ लाड यांनी  सांगितले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने आनंदी व समाधानी, निरोगी राहण्यासाठी योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे. आपण करत असलेलं कार्य हे निश्चितच अनुकरणीय आहे. त्यामुळे मानवत नगर परिषदेच्या वतीने जागा देऊन एक भव्य सभागृह निर्माण करून देण्यात येईल. मला विश्वास आहे की, या माध्यमातून मानवत शहरातील सुदृढ व निरोगी समाज आणि तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग मोलाची कामगिरी बजावेल. 
१७ सप्टेंबर २०२२ रोजी मानवत नगर परिषद येथे जाऊन भास्कर मगर, सुनील बोरबने, दीपक शर्मा ,सचिन कोक्कर, सचिन हिबारे, दत्ता हजारे, नाना कदम व सर्व साधक यांनी डॉ लाड यांची  भेट घेतली. एक मानवतावादी व्यक्तिमत्व व अध्यात्मिक गुरु म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची ख्याती जगभरात आहे. 'तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज' हे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी आर्ट ऑफ लिविंगची शिबिरे आणि उपक्रम सर्वत्र सुरू असतात. हि माहिती दिली होती व त्याच अनुषंगाने मानवत शहरात अत्याधुनिक असे आर्ट ऑफ लिव्हिंग चे ध्यान मंदिर असावे अशी मागणी केली होती हि मागणी लक्षात घेऊन या कामासाठी फार मोठ्या प्रमाणत निधी लागणार असल्याने डॉ लाड यांनी या करीता शासन दरबारी पाठपुरावा केला असता. त्यास यश मिळत या कामाच्या प्रत्यक्ष सुरुवात ७ ऑक्टो रोजी करण्यात आली. या वेळी या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षका कोमल सावरे , अन्वर सर, नगर अभियंता, आर्ट ऑफ लिविंग शिक्षक भास्कर मगर, सुनिल बोरबने, सूर्यप्रकाश तिवारी नरेंद्र रत्नपारखी, सार्वजनिक बांधकाम विभाग  पाथरी उपविभागाचे अभियंता  बालासाहेब सामाले, अंकूश गरड,  हे उपस्थित होते. या वेळी मुख्याधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जगभरात सुरू असलेल्या सर्वांच्या शारीरिक व मानसिक आरोग्या मध्ये सुधारणा होण्यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या तणावमुक्त व्यक्ती आणि हिंसामुक्त समाज निर्मितीच्या कार्याचे कौतुक केले आणि तेच कार्य आपल्या परिसरामध्ये वाढण्यासाठी ह्या ध्यान मंदिराचा फायदा मानवतकरांना नक्की होईल असे सांगितले.आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने भास्कर मगर यांनी गुरूपूजा आणि डॉ.अंकूश लाड व मुख्याधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पुढील कार्यास सुरुवात करण्यास सुरुवात झाली.

मानवत शहारात भव्य असे अत्याधुनिक ध्यान मंदिर होणार असल्याने आर्ट ऑफ लिव्हिंग चे   अशोक भंडारे,कार्तिक तळेकर,प्रभू वाघमारे,सारडा रामस्वरूप, नारायण थावरे(पाथरी),गोपाळ टोपे,हरिभाऊ शिसोदे,शाम दहे,अवि दहे,बाळू शास्त्री,विशाल भालेराव,अरुण कच्छवे ,संजय बाहेती,निवृत्ती गोरे,प्रकाश कदम( लिंबा),परशुराम महात्मे,राजू बुरलेवार,.रंगनाथ कोंडगिर,संतोष रुद्रकंठवार,राजेश टोपे,दत्ता कुठे,दत्ता ठोंबरे,रवींद्र ठाकूर,बाबासाहेब अवचार,सतीश अवचार,गोविंद अवचार,संजय हिबारे,दीपक महिपाल(पाथरी),रामनिरंजन सारडा , बाचेवार लक्ष्मीनारायण, सचिन हिबारे, हरिभाऊ मुळे, ईश्वर अवचार, सोमनाथ लासे,आंबेकर रामचंद्र, सुदाम रासवे,सौ.गरड ताई(पाथरी),भागवत आगे(पाथरी), ठोंबरे सर(पाथरी),हरकळ (पाथरी), नवनाथ कोल्हे(पाथरी), स्नेहा झंवर या साधकांनी नगर पालिका प्रशासनाचे व डॉ अंकुश लाड यांचे आभार मानले. 

Sunday, October 6, 2024

सावता माळी मंदिर परिसरातील नालीच्या कामाचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न 

सावता माळी मंदिर परिसरातील नालीच्या कामाचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथील संत सावता माळी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात जात होते तसेच पाणी रस्त्यावर साचत होते.  हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने राहणाऱ्या नागरिकांनी लावून धरत  युवानेते डॉ. अंकुश लाड यांच्याकडे या बाबत मागणी केली होती याची दखल घेत  शासन दरबारी यासाठी निधी मिळविणे करीता पाठपुरावा केला या कामासाठी निधी खेचून आणला व ६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता या नाली कामाचे उद्घाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. 

संत सावता माळी कमान ते राष्ट्रीय महामार्ग ६१ हा साधारण ८००  ते ९००  मीटर असलेला रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती झाली आहे.  या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर पावसाच्या असो की नागरिकांचे सांडपाण्याचे दोन्ही पाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची देखील दुरावस्था होत होती.  म्हणून या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मोठी नाली बांधून राष्ट्रीय महामार्ग ते संत सावतामाळी कमान या दरम्यान नाली झाल्यास रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे पाणी येणार नाही परिणामी ते पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही यामुळे या परिसरातील नागरीक  वारंवार डॉ. अंकुश लाड यांच्या संपर्कात होते.  नाली नसल्यामुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांनी डॉ.  अंकुश लाड यांना दिली.  या मागणीचा गांभीर्याने विचार करत डॉ.  लाड यांनी शासनाकडून या कामासाठी निधी खेचून आणला ६  ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या नाली कामाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी डॉ अंकुश लाड यांनी  या कामाचे उद्घाटन केले तर प्रभागाचे नगरसेवक गिरीशशेठ कत्रुवार , दत्ताभाऊ चौधरी  ,गणेश कुमावत ,संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कोक्कर , बळीराम रासवे ,इंजिनीयर बबन राऊत साहेब ,  ज्ञानेश्वर रासवे, नारायण रासवे , भिकाजी रासवे ,नामदेव कोकर ,व्यंकटेश चौधरी ,श्रीधर कोकर , उद्धव रासवे सर,वसंत मोरे, गणपत सिसोदे, डॉक्टर कहकर  साहेब ,श्री मुंजाभाऊ राऊत, प्रा.  गजू रासवे, मगर साहेब, देवा भरड, सुनील रासवे, कृष्णा रासवे, महेश वाघमारे, बालाजी रासवे ,मधुकर रासवे, मनोहर राऊत ,श्री सोपान वाघमारे, गणेश वाघमारे ,आकाश राऊत, ओम राऊत ,गणेश गोरे ,अमोल चौधरी ,कृष्णा रासवे, पप्पू डाके, हनुमान चौके शिवा शेंडगे व संत सावता माळी नगरातील सर्व रहिवासी यावेळी  उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मानवत नगरीचे भाग्यविधाते डॉक्टर अंकुश भाऊ लाड गिरीश कञुवार दत्ताभाऊ चौधरी गणेश  कुमावत यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानन्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव रासवे  सर यांनी केले तर  आभार दत्ताभाऊ चौधरी यांनी मानले.



Friday, October 4, 2024

मानवत येथे एम आय एम पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन

मानवत येथे एम आय एम पक्षप्रवेश मेळाव्यात मोठ्यासंख्येने उपस्थीत रहा - तालुकाध्यक्ष  शेख मुस्ताक 
मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत  येथे ५  ऑक्टोबर शनीवार रोजी एम आय एम पक्षाच्यावतीने जाहीर पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला ,समीर बिल्डर तसेच परभणी जिल्हाध्यक्ष  ॲड .इम्तियाज खान , शफिक भाई,हाफेज अलीशर उपस्थित राहून मार्ग दर्शन करणार आहेत तरी नागरीकांनी या कार्यक्रमास  उपस्थीत राहण्याचे आवाहान एम आय एम पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ऊर्फ अल्लारखां यांनी केले आहे.
मागील अनेक वर्षा पासून मुस्लिम धर्माचे अनेक नेते ,युवक विविध पक्षात काम करत आहेत अनेक नेते मुस्लिम समाजाची मते घेऊन खासदार,आमदार मंत्री झालेत परंतु हेच नेते मुस्लिम समाजासाठी हिता चे कायदे न करता चुकीचे कायदे करणाऱ्याना समर्थन देत आहेत धर्म गुरु ना विनाकारण 
अटक करणे मुस्लीम धर्मा विषयी वाईट बोलणे या  नेत्यांवर कार्यवाही करण्याऐवजी त्यांना साथ देत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचे खच्चीकरण होत आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष सोबत न जाता एम आय एम पक्ष नेहमी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत आहे. एम आय एम पक्षावर विश्वास ठेवून ५ आँकटोबंर शनीवार   रोजी शेकडो कार्यकर्ते एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे असे एम आय एम पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ऊर्फ अल्लारखां यांनी प्रसिद्धी पञिकेद्वारे कळविले आहे तरी जास्तीत जास्त नागरीकांनी पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहान मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक  यांनी केले आहे.

Thursday, October 3, 2024

खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड 

खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी तथा अ.भा.कॉं.कमिटीचे सेक्रेटरी मा‌.श्री.कुनाल चौधरी व दिव  दमन हवेलीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.महेशजी शर्मा हे  विधानसभेच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता  त्यांच्या हस्ते व पाथरी मतदारसंघाचे  आमदार  सुरेशरावजी वरपुडकर  यांच्या उपस्थितीत, परभणी येथे खय्युम भाई (सहारा)बागवान यांची मानवत  अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या आशयाचे पञ त्यांना यावेळी  देऊन  सत्कार करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
यावेळी मा.नगरसेवक सय्यद जमील, मिनहाज कादरी, अनंता मामा भदर्गे , अफसर अन्सारी, शाम भाऊ चव्हाण,वसीम कुरेशी , सय्यद आरिफ ,इलियास पठान ,इरशाद बागवान ,शोएब कुरैशी ,विक्रम सिंह दहे ,गणेश दहे ,अशफाक कुरैशी ,सोनू कुरैशी शाहिद पठान आदी उपस्थीत होते.
खय्युम भाई (सहारा)बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  राजकिय ,सामाजिक क्षेञातुन या निवडिचे स्वागत होत असुन त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.