Thursday, November 27, 2025

मानवत युवा पॅंथर च्या वतीने भारतीय  संविधान दिन उत्साहात साजरा

मानवत युवा पॅंथर च्या वतीने भारतीय  संविधान दिन उत्साहात साजरा
मानवत प्रतिनिधी
विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांनी २ वर्षे११महिने १८ दिवस राबून या देशाच संविधान लिहिलं.रंकाला राजा बनण्याचा आणि बनवण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पतंगे साहेब(पोलीस उप निरीक्षक),शरीफ भाई(पोलीस नायक),लिपारे सर,घाटूळे सर,पैंजने सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलास खरात सर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले.बोलतांना ते पुढे म्हणाले की,या देशाच सार्वभौमत्व फक्त भारतीय संविधाना मुळेच टिकून आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक विलास खरात सर व युवा पॅंथरचे सन्माननीय पदाधिकारी  रविभाऊ पंडीत, नागसेन भदर्गे,दिपक ठेंगे, पप्पू गायकवाड,बिजू खरात, आकाश खंदारे,बाळा धबडगे आणि सर्व युवा पँथर्स मानवत, यांच्या सहकार्यातून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment