महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे प्रेमनगर आश्रम, राणीपूर, हरिद्वार,उत्तराखंड. येथे २८ जून ते १जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या पहिल्या १८ वर्षातील मुले/मुली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी मुलींच्या महाराष्ट्र संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.सदरील संघाची निवड चाचणी बालेवाडी क्रीडा संकुल येथे दिनांक १४ ते १८ जून दरम्यान होणाऱ आहे.१८ वर्षा आतील मुले व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ही पहिल्यांदाच होत असून सदरील बहुमान हा परभणी जिल्ह्याला मिळाल्याबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा.आमदार श्री सुरेशराव वरपूडकर साहेब तसेच महाराष्ट्र असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री मंगलजी पांडे,प्रा.डॉ माधव शेजुळ, व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Friday, June 6, 2025
महाराष्ट्र कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची निवड
Monday, May 26, 2025
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत येथे प्रवेश प्रक्रिया सुरू – पालकांचा उत्तम प्रतिसाद
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत येथे प्रवेश प्रक्रिया सुरू – पालकांचा उत्तम प्रतिसाद
मानवत/ मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविनत्मता विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत येथे सन २०२५-२६ करिता एक वर्ष व दोन वर्ष कालावधीच्या विविध व्यवसायांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या संस्थेमध्ये विजतंत्री इलेक्ट्रिशियन , वायरमन, , फिटर, जोडारी, यंत्रकारागीर, आरेखक स्थापत्य, यात्रिक कृषित्र , वेल्डर यांसारख्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. एकूण १८४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थेचे निर्देशक शकिर हाशमी हे स्वयं उपस्थित राहून येणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणक्रमांची सविस्तर माहिती देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पालक आणि विद्यार्थी संस्थेतील प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक सजग होत असून संस्थेबाबत समाधान व्यक्त करत आहेत.
शासनमान्य अभ्यासक्रम, सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी प्रशिक्षक आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम यामुळे ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संधी ठरत आहे.
Monday, May 19, 2025
मानवत येथील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
Monday, May 12, 2025
मानवत येथील जमजम कॉलनीत नवीन पाईपलाईनचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन
मानवत येथील जमजम कॉलनीत नवीन पाईपलाईनचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन
मानवत / मुस्तखीम बेलदार
प्रभाग क्रमांक ७ मधील जमजम कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासत होती. ही गंभीर बाब स्थानिक नागरिकांनी युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्वरीत पुढाकार घेत आज जमजम कॉलनीमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ केला या महत्त्वपूर्ण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
जमजम कॉलनीसह संपूर्ण बांगर प्लॉट परिसरात महिलांना व वयोवृद्धांना पाण्यासाठी लांब अंतर प्रवास करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. लाड यांनी लवकरच पाईपलाईनच्या माध्यमातून घराघरांत पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. या उद्घाटन सोहळ्यावेळी त्यांनी परिसरात लवकरच विद्युत खांबही बसवले जातील, असे आश्वासन दिले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. लाड यांनी सांगितले की, बांगट प्लॉट, राज गल्ली, गालिब नगर आणि आंबेगाव नाका या परिसरांमध्ये पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सय्यद जमील, माजी नगरसेवक नियमत खान, अफसर अंसारी, अनंद मामा भदर्गे, हबीब भडके आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय हाजी रफिक कुरेशी, नूरभाई कुरेशी, फयाम बेलदार, करीम बेलदार, रफिक भाई कुरेशी टेकडी वाले, शेख बडे मिया, बाबू फूप्फा, इब्राहिम भाई, शेख बाबूभाई, सय्यद समीर, सिराज मदनी, रफिक शेख, शफी सफारी टेलर अन्सारी,इलियास पठाण, शिरूभाई, माजिद शेख, अब्दुल वाहब कुरेशी, सिद्दीक भाई ड्रायव्हर,करीम मामू मिर्झा अगु भाई यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Saturday, May 10, 2025
मानवत येथील शिवसेना नेते बालाजी कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मानवत येथील शिवसेना नेते बालाजी कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
[] वाढदिवसानिमित वृद्धाश्रमात वृद्धांना केले फळवाटप []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा समाजसेवक , शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे समर्थक बालाजी कुराडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमासह मोठ्या उत्साहात दि.९ मे रोजी साजरा करण्यात आला.
युवा नेते बालाजी कुराडे यांनी वृद्धाश्रमात आपल्या वाढदिवसाच्या या खास दिवशी त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन प्रेमळ भेट देत वृद्धांना फळवाटप केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला
आश्रमातील प्रत्येक चेहऱ्यावर यावेळी हास्य उमटले होते.
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बालाजी कुराडे यांना वाढदिवसा निमित्त शाल व हार घालून शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात ढोल ताशे च्या गजरात नागरीकांनी बालाजी कुराडे यांचे जंगी स्वागत करत वाढदिवस साजरा केला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील स्थानिक नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था नी बालाजी कुराडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहे.
Friday, May 9, 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानवत दौरा
Thursday, April 3, 2025
मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड
मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
ग्रामीण भागातून मानवत शहरात येणाऱ्या महिला आणि शहरातील माता-भगिनींसाठी लवकरच सुविधायुक्त सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मानवत शहराचे युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
महिलांना शहरात येताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यामध्ये शौचालयाच्या अपुऱ्या सुविधांमुळे होणारा त्रास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या समस्येच्या स्थायी समाधानासाठी लवकरच नियोजन करून आवश्यक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येतील, असे डॉ. लाड यांनी स्पष्ट केले.
तसेच, महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आधुनिक शौचालयांची उभारणी करून त्या ठिकाणी योग्य स्वच्छतेची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लवकरच यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.