Thursday, April 3, 2025

मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड

मानवत शहरात लवकरच महिलांसाठी शौचालय सुविधा – डॉ. अंकुश लाड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
ग्रामीण भागातून मानवत शहरात येणाऱ्या महिला आणि शहरातील माता-भगिनींसाठी लवकरच सुविधायुक्त सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मानवत शहराचे युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

महिलांना शहरात येताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यामध्ये शौचालयाच्या अपुऱ्या सुविधांमुळे होणारा त्रास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या समस्येच्या स्थायी समाधानासाठी लवकरच नियोजन करून आवश्यक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येतील, असे डॉ. लाड यांनी स्पष्ट केले.

तसेच, महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आधुनिक शौचालयांची उभारणी करून त्या ठिकाणी योग्य स्वच्छतेची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लवकरच यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Monday, March 31, 2025

शेक हॅन्डचा रमजान ईद निमित्त सामाजिक योगदान!

शेक हॅन्डचा रमजान ईद निमित्त सामाजिक योगदान
[] निराधार महिलेस स्वावलंबी बनवण्यासाठी  दिली गिरणी भेट []

मानवत / मुस्तखीम बेलदार
शेक हॅन्ड संस्थेने रमजान ईदच्या पवित्र पर्वावर सामाजिक कार्याचा एक नवीन आदर्श प्रस्तुत केला आहे. संस्थेने इशरत बी शेख मोहिद्दीन यांना पीठ व दाळ तयार करण्यासाठी गिरणी भेट देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इशरत शेख यांच्या पतीचे आजाराने निधन झाले असून, त्यांना तीन अपत्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत अवघड आहे, कारण त्यांच्याकडे घर, जमीन किंवा इतर संपत्ती नाही. रोज मरणासन्न मजुरी करून त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.

इशरत शेख यांचे मूळ गाव सुरपिंपरी आहे आणि त्या सध्या मानवत येथे राहत आहेत. त्यांचे तीन अपत्य, शेख शाहिद, सुमैय्या बी, आणि शेख सय्यद यांचा शिक्षणासाठी संघर्ष करत आहेत. इशरत यांना एक नवा रोजगार सुरू करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती, म्हणून शेक हॅन्ड संस्थेने रमजान ईदच्या निमित्ताने त्यांना पीठ आणि डाळ तयार करण्यासाठी गिरणी भेट दिली. यामुळे त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला सुधारू शकतील आणि स्वावलंबी होऊ शकतील.

या कार्यक्रमासाठी शेक हॅन्ड संस्थेच्या अर्चना भारस्वाडकर, वैभव ठाकूर, शाम गाडेकर, छाया गायकवाड, रत्नमाला बेले, मुंजाभाऊ शिळवने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. या वेळी मानवत येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असद खान, छाया गायकवाड, प्रियंका दुमाणे, श्री नेवरीकर सर तसेच शेक हॅन्ड चे परमेश्वर सिराळ, शरद लोहट यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

शेक हॅन्ड संस्थेचे हे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले असून, त्यांनी सामाजिक जबाबदारी पार केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे मानवत परिसरात नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Friday, March 28, 2025

मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध

मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध
मानवत/ मुस्तखीम बेलदार
जुमा तुल विदा म्हणजे रमजान महिण्याचा शेवटचा शुक्रवार या दिवशी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनाल लॉ बोर्ड ने देशभरात वकफ संशोधन विधेयक २०२४ च्या विरुद्ध निषेध म्हणून शुक्रवार च्या नमाजा मध्ये हाताला काळी पट्टी बाधुन नमाज पढुन वकफ बिलाचा विरोध मौन प्रदषण करण्याचे आवाहान केले होते या साठी वक्फ संशोधन विधेयक २०२४ विरोधात मानवत येथील मुस्लीम बांधवानी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. हे विधेयक वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल सुचवते, ज्यामुळे  मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी त्याचा विरोध केला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) आरोप केला आहे की हे विधेयक देशभरातील वक्फ संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे. त्यांनी संयुक्त संसदीय समितीवर (JPC) काम ईमानदारीने न केल्याचा आरोपही केला आहे. 
जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी यांनीही विधेयकाची टीका केली आहे, असे सांगत की हे मुस्लिम समुदायासाठी स्वीकारार्ह नाही आणि वक्फ संपत्तीच्या स्वायत्ततेला कमी करते. विधेयकाच्या तरतुदींमध्ये वक्फ संपत्तीवरील अतिक्रमण, वक्फ निधीचा दुरुपयोग, आणि आवश्यक माहिती न देणे यांसाठी नवीन अपराध आणि त्यानुसार दंडांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, वक्फ संपत्तीवर अवैध कब्जा केल्यास २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. केंद्र सरकारने विधेयकात १४ बदल मंजूर केले असून, विरोधी पक्षांचे ४४ प्रस्ताव नाकारले आहेत. या बदलांमध्ये वक्फ बोर्डामध्ये गैर-मुस्लिम सदस्यांची नियुक्ती, वक्फ संपत्तीच्या नोंदणीसाठी वेळेची मर्यादा, आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका वाढवणे यांचा समावेश आहे. 
या पार्श्वभूमीवर, मानवत येथील नागरिकांनी काळ्या फिती लावून या विधेयकाचा विरोध दर्शविला आहे, ज्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा आणि चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

Friday, February 14, 2025

वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान 

वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान 
मानवत प्रतिनिधी
वजुर खुर्द येथील गट क्रमांक १६ मध्ये विठ्ठल तातेराव वावडे या शेतकऱ्याचे शेतात १२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने सोलारचे मोठे नुकसान झाले आहे.
विठ्ठल तातेराव वावडे  शेतकरी यांचे१२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने  सौर ऊर्जा कृषी पंप सोलार चे पाच पाट्या पूर्ण निकामी झाली आहे यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या संबंधी त्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी ती मागणी करत आहे.

Monday, February 3, 2025

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राजश्री शाहू महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
मानवत,/प्रतिनिधी 
येथील राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अकरावी व बारावीतील वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले होते यात सकाळ-सत्रामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर अंकुश भाऊ लाड अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांत लिंग काळे प्रमुख अतिथी रितेश भैया काळे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी मुख्य मार्गदर्शक श्री बजरंग ग्रीडा शिक्षण विस्तार अधिकारी मानवतप्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी आत्माराम कुठे  दत्ताभाऊ चौधरी नगरसेवक मानवत  श्री किसन भिसे अध्यक्ष स्पोर्ट अकॅडमी मानवत काशिनाथ शिंदे संचालक समाज प्रबोधन संस्था पात्री लक्ष्मण पाठक प्राचार्य महात्मा बसेश्वर कनिष्ठ महाविद्यालय रामटाकळी तसेच सत्यशील धबडगे दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी मानवत उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक अंकुश भाऊ लाड यांनी मानवत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्तेची गरज असून शैक्षणिक कार्यासाठी व मानवत शहराच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न शील असून शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मानवत शहरांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानवत शहर हे शिक्षणाचे माहेरघर झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बजरंग गिलडा यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेयरणादायी गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत घेतली तर विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होतो यासाठी अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले 
तसेच ग्रामीण कवी आत्माराम कुठे यांनी उत्कृष्ट अशा देशभक्तीपर सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानावर कविता सादर केल्या माय बापावर प्रेम करा ही कविता सादर केली प्रेमावर कविता करून तरुणांची मने जिंकलीशेतकरी दादा तुला दलाला लुटलं या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर हास्यविनोद करून कार्यक्रमात रंगत आणत विद्यार्थ्यांची मनी जिंकली मानवत शहरातील राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांनी मानवत चे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकवले अशा गौरी दहे आरती चव्हाण व संध्या पिंपळेया विद्यार्थिनीचा युवानेते डॉ अंकुश भाऊ लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मानवत शहरातील निर्भया पथक प्रमुख शकुंतला ताई चणे यांचा प्राचार्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी अध्यक्ष समारोप करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात त्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष शांत लिंग काळे यांनी सांगितले या कार्यक्रमात आनंद नांदगावकर सर यांनी काढलेल्या स्नेहसंमेलनाच्या उत्कृष्ट रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भगवान घाटूळ यांनी तर सूत्रसंचालन गोविंद रासवे सर यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य शिवशक्ती कुकडे मॅडम यांनी केले 
यानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व दुपार सत्राला सुरुवात झाली याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळी लावणी लोकगीत कथक नृत्य पोवाडा शाहिरी अशा विविध कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या तसेच शेलापागोटे व संगीत शेलापागोटेचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच प्राध्यापक संतोष पवार यांनी केलेल्या अनेक शेरोशायरी मधून कार्यक्रमाला रंगत आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत जोजारे कुरेशी सर काशिनाथ जाधव यांनी केलेआणि शेवटी संगीतावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनसोक्त डान्स करत आनंद घेतला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांती लिंग काळे सर यांनी विद्यालयातील उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिवशक्ती कुकडे प्रा संतोष पवार प्रा  भगवान घाटूळ गोविंद रासवे गोविंद पाटील प्रा अनुसया काळे दैवशाला शिरसागर सुनिता शिंदे  प्रा शिवराज गिराम प्रा गजानन चौरे प्रा मुंजाजी कांबळे प्रवीण पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 28, 2025

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे तर उपाध्यक्षपदी शिवाजी ठोंबरे यांची निवड

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या  अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दिनांक २६ जानेवारी रविवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या  जयंतीनिमित्त जिजाऊ नगर मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील सर  मुख्य मार्गदर्शक नारायण पानझाडे, हे होते यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीची निवड करण्यात आली असून, जयंती समितीचे अध्यक्षपदी ओंकार माणिक वाघमारे, तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी दीपक  ठोंबरे, सचिव राजेंद्र देविदास कांबळे, सहसचिव  शिवाजी भगवान शिंदे, कोशाध्यक्ष ज्ञानेश्वर उत्तम पानझाडे,  कार्याध्यक्ष परमेश्वर वाघमारे तर सल्लागार म्हणून प्रा.एस. एन. पाटील सर , मुरलीधर ठोंबरे, नारायण पानझाडे, हनुमान नांदुरे, मदनराव कांबळे, सुदामराव कांबळे व सदस्यपदी भागवत कांबळे, रमेश केंदळे, शिवप्रसाद कावळे, गणेश कांबळे, रामेश्वर पानझाडे, कृष्णा सावरे, घनश्याम कुरील, कमलाकर फुलपगार,  यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या २३ फेब्रुवारी रविवार रोजी गुरु रविदास महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, व गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे निश्चित झाले आहे २३  फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा मध्यवर्ती बँक ते महाराणा प्रताप चौकातून गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार व या नंतर बारा ते तीन निमंत्रित मान्यवरांचे सत्कार व मनोगत चा कार्यक्रम संपन्न केला जाईल, व लागलीच कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले आहे.
या वेळी अर्जुन ठोंबरे,संतोष कांबळे, ज्ञानोबा नेटक, रामेश्वर पानझाडे, विलास पानझाडे, गणेश पानझाडे, गणेश कांबळे, मारोती पवार,हरी ठोंबरे, शिवा पानझाडे, तुकाराम पानझाडे, दिनेश आधाटे, बालाजी पानझाडे, अशोक कांबळे, रमेश ठोंबरे  यांच्या  सह  चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या  अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे यांची निवड

 श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीच्या  अध्यक्षपदी ओंकार  वाघमारे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
 दिनांक २६ जानेवारी रविवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या  जयंतीनिमित्त जिजाऊ नगर मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील सर  मुख्य मार्गदर्शक नारायण पानझाडे, हे होते यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या जयंती समितीची निवड करण्यात आली असून, जयंती समितीचे अध्यक्षपदी ओंकार माणिक वाघमारे, तर उपाध्यक्ष म्हणून शिवाजी दीपक  ठोंबरे, सचिव राजेंद्र देविदास कांबळे, सहसचिव  शिवाजी भगवान शिंदे, कोशाध्यक्ष ज्ञानेश्वर उत्तम पानझाडे,  कार्याध्यक्ष परमेश्वर वाघमारे तर सल्लागार म्हणून प्रा.एस. एन. पाटील सर , मुरलीधर ठोंबरे, नारायण पानझाडे, हनुमान नांदुरे, मदनराव कांबळे, सुदामराव कांबळे व सदस्यपदी भागवत कांबळे, रमेश केंदळे, शिवप्रसाद कावळे, गणेश कांबळे, रामेश्वर पानझाडे, कृष्णा सावरे, घनश्याम कुरील, कमलाकर फुलपगार,  यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या २३ फेब्रुवारी रविवार रोजी गुरु रविदास महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज, व गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे निश्चित झाले आहे २३  फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा मध्यवर्ती बँक ते महाराणा प्रताप चौकातून गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार व या नंतर बारा ते तीन निमंत्रित मान्यवरांचे सत्कार व मनोगत चा कार्यक्रम संपन्न केला जाईल, व लागलीच कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले आहे.
या वेळी अर्जुन ठोंबरे,संतोष कांबळे, ज्ञानोबा नेटक, रामेश्वर पानझाडे, विलास पानझाडे, गणेश पानझाडे, गणेश कांबळे, मारोती पवार,हरी ठोंबरे, शिवा पानझाडे, तुकाराम पानझाडे, दिनेश आधाटे, बालाजी पानझाडे, अशोक कांबळे, रमेश ठोंबरे  यांच्या  सह  चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, January 27, 2025

महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला शालेय साहित्याचे वाटप

महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला शालेय साहित्याचे वाटप

मानवत / मुस्तखीम बेलदार 
  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथील महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला पाच हजार रुपयांचे शालेय साहित्य देण्यात आले या मध्ये शालेय साहित्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन फॅन व शिक्षकांसाठी एक ऑफिस फॅन देण्यात आले तसेच शाळेला सक्षम व विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी पेन वह्या व भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
        यामध्ये महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक दिलीप चव्हाण व त्यांचे सहकारी माणिक राठोड तसेच क्रुष्णा चव्हाण, विकास चव्हाण यांनी या कार्यास आपले मोलाचे योगदान दिले
संस्थेच्या या कार्याबद्दल जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक संजय जाधव (मुख्याध्यापक) व दिनकर ढाकणे सर (शिक्षक) यांनी (सेवाभावी संस्था चालक) दिलीप चव्हाण व माणिक राठोड, कृष्णा चव्हाण, विकास चव्हाण, अमोल राठोड, अशोक चव्हाण, विनोद चव्हाण, सचिन जाधव यांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले.ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी नवनविन उपक्रम राबविण्यात यावे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायत मार्फत सक्षम  बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे आव्हान दिलीप चव्हाण महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालक यांनी नवयुवकांना तसेच ग्रामस्थांना सुचवले.

Wednesday, January 22, 2025

मनपा नारेगावच्या शाळेला जर्मनी येथील पाहुण्यांची भेट

मनपा नारेगावच्या शाळेला जर्मनी येथील पाहुण्यांची भेट
औरंगाबाद /प्रतिनीधी 
मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा नारेगाव येथे २२ जानेवारी  रोजी  केंद्रीय मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती संगीता ताजवे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री अब्रार अहमद सर यांच्या उपस्थितीमध्ये आय एस पी एफ आणि सेमिंस अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट जिज्ञासा ईन्टर स्कुल स्टिम फेअर अंतर्गत इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्याची विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते ही विज्ञान प्रदर्शनी दरवर्षी घेण्यात येते विशेष म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने संयोजकांनी  इयत्ता सातवी ते दहावी मधून दोन भागात ही प्रदर्शनी  घेण्याचे ठरविले व  इयत्ता सातवी व आठवीचे विज्ञान प्रदर्शनी मध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महत्वपूर्ण बाब म्हणजे या प्रदर्शनीसाठी जर्मनी येथून सिमेंस कंपनीचे फायनान्स लीडरशिप टीम ज्यामध्ये मिस्टर ऑर्बन वॉन फॅड्रिक सर , मिस्टर जिग्नेशाह सर आणि श्रीमती सौंदरम सुंदरम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. विदेशी पाहुण्यांचा स्वागत लेझीमद्वारे व शाल पुष्पगुच्छ आणि विशेष भेटवस्तू देऊन करण्यात आले .
 शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद अबरार अहमद सर आणि श्री जुबेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोजेक्ट जिग्यासाचे 
Iनम्रता सोनवणे मॅडम आणि स्टेम कोच श्री शरद गवई  सर यासोबत शाळेच्या शिक्षक वृंद यांच्या सहभागाने आजचे विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.विदेशी पाहुण्यांनी नारेगावच्या स्मार्ट शाळेची बारकाईने पाहणी केली व शाळेची व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ..
संयोजकांकडून तीन विजेते आणि जर्मनी येथून आलेल्या पाहुण्यांतर्फे विशेष दोन पारितोषिक देण्यात आले यात प्रथम क्रमांक
सालिक परवेज जावेद इम्रान ३५००रु,
 नवाज एजाज आणि यखीन अजीम३०००,
 मोमीन इन्सरा इरफान२५०० रु तर विशेष पारितोषिक मध्ये शेख आलिया वसीम २०००रु व शेख साद शफिक २०००रुपयाचे पारीतोषीक विद्यार्थीना मिळाले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, January 16, 2025

मानवतचे विद्यार्थी पुन्हा ठरले चॅम्पियन

मानवतचे विद्यार्थी पुन्हा ठरले चॅम्पियन
 मानवत / मुस्तखीम बेलदार 
 छ.संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय खुली कराटे स्पर्धा मध्ये मास्टर्स स्पोर्ट्स अकॅडमी मानवतचे एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. काथा व कुमीते या दोन्ही प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कराटेचे प्रदर्शन करून एकूण ३२ पदकांची कमाई केली .ज्यामध्ये२० सुवर्णपदक व ११ रौप्य आणि १कांस्यपदक आहे .पदक पटकावलेल्या स्पर्धकांत
कार्तीक राऊत, गौरव गायकवाड, खुजैमा सय्यद, जफर खॉं, नवीद सय्यद, रेहान शेख, मोहम्मद मोईन, अहमद शेख, विश्वरत्न धापसे, रोमान कुरेशी, उमर अन्सारी, समीर सय्यद, जुबेर अली, फातिमा शेख, अक्षरा साळवे, नेहा शेख विद्यार्थी आहे.    मार्गदर्शक सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक आसिर खॉं बशीर खॉं पठाण यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेसाठी श्री विलास खरात सर ,बालाजी शिंदे ,सुरेश देवर्षी यांचे सहकार्य लाभले, डॉक्टर शेख अलीम, डॉक्टर आरजू मॅडम तसेच स्पर्धकांच्या पालकांनी अभिनंदन केले, हाजी रफिक कुरेशी यांनी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले.

Friday, January 10, 2025

व्हाईस आँफ मिडियाचे तालुकाध्यक्ष कचरुलाल बारहाते यांचा भव्य सत्कार

व्हाईस आँफ मिडियाचे तालुकाध्यक्ष कचरुलाल बारहाते यांचा भव्य सत्कार
मानवत / मुस्तखीम बेलदार 

व्हाईस ऑफ मीडियाच्या मानवत  तालुकाध्यक्षपदी कचरुलाल बारहाते  यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल   बुधवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५  वाजता मानवत येथे व्हाईस ऑफ मीडिया  संघटना पदाधिकाऱ्यांच्या  वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला 
सोमवारी ६ जानेवारी रोजी दैनिक देशोन्नती कार्यालयात दर्पण दिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीमध्ये दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मीडियाच्या मानवत  तालुकाध्य निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी कचरुलाल बारहाते  यांची तिसऱ्यांदा मानवत तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे  राजकिय, सामाजिक, ईष्ट मिञमंडळाच्या वतिने त्यांचा यशोचित सत्कार होत आहे बुधवार 8 जानेवारी  व्हाईस ऑफ मीडियाच्या  पदाधिकाऱ्यांच्या  वतिने शहरातील दैनिक देशोन्नती कार्यालयात कचरुलाल बारहाते  यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा  बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पञकार सत्यशिल धबडगे, प्रा.किशन बारहाते,प्रा.गोविंद गहीलोत,भैय्यासाहेब गायकवाड,  मुस्तखीम बेलदार,अलीमखान पठाण,विलासराव बारहाते,ईरफान बागवान, हाफिज बागवान,शेख  रियाज, प्रमोद तारे,डॉ.एम, ए, रिजवान ,कपील शिंदे उपस्थीत होते.

प्रतिक्रिया .....
माझ्यावर विश्वास दाखवून व्हाईस ऑफ मीडियाच्या आपण सर्व पत्रकारांनी  माझी तिसऱ्यांदा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद येणाऱ्या काळात पञकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी  प्रयत्न करुन पञकांराना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहू

कचरुलाल बारहाते
तालुकाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, मानवत