Thursday, February 19, 2015

About Caste Certificate

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 3 जुन 1996 च्या शासन निर्णय क्रमांक सीवीसी 1096/ प्र. क्र. 48/मावक-5 अध्यादेश क्रमांक 20 नुसार जी व्यक्ती अनुसुचित जातीची असल्याचा दावा करते तीचा धर्म हिँदु, बौद्ध किँवा शिख असु शकतो अशी तरतुद आहे अध्यादेश क्रमांक 29 मध्ये म्हटले आहे की जर वडिलांचे प्रमाणपत्र अनुसुचित जातीचे असेल परंतु जर अर्जदाराच्या कागदोपत्री बौद्ध असल्याचा उल्लेख असेल तर त्याला त्या कागदोपत्राच्या आधारावर बौद्ध असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. दिनांक 3 जुन 1990 पासुन धर्माँतरीत बौद्धांना राज्य तथा केंद्र सरकारच्या घटनात्मक सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येईल असे 8 नोव्हेंबर 1990 च्या परिपत्रकात म्हटले आहे.दिनांक 3 जुन 1996 च्या परिपत्रकान्वये केंद्र शासनाने बौद्धांच्या सवलती रद्द केल्याचा कोणताही अध्यादेश नसतांना सुद्धा काही काही मनुवादी हिंदु उपायुक्त अधिकारी, तहशीलदार, अर्जनविस आपला धर्म वाढविण्याकरीता आपल्याला चुकीची माहीती देवुन आपल्या कागोपत्री जाणीव पुर्वक महार असल्याचा उल्लेख करतात कारण बौदांची संख्या वाढु नये आणि त्यांना बौद्धांच्या व अनुसुचित जातीच्या दुहेरी योजनांचा लाभ मिऴु नये हा त्यांचा कुटील डाव आहे.मित्रांनो भारतीय घटनेच्या कलम 341 नुसार घटना अध्यादेश 1950 च्या परीच्छेद 3 नुसार अनुसुचित जातीसंबंधी घटना आदेश बौद्धधर्मियांनालागु केल्याचे म्हटले आहे तसेच अनुसुचित जाती जनजाती प्रतिबंध कायदा 1989 नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 अधिनियम क्रमांक 22 नुसार जर उपविभागीय अधिकारी, तहशिलदार, अर्जनविस यांनी चुकीचे जाती उल्लेखित दस्तावेज लिहील्यास अर्जदाराची जातीवाचक शब्दाने मानहानी केल्यास संबंधीतावर कार्यवाही करण्यात येईल अशी तरतुद केली आहे. तरी कृपया आपण कोणत्याही प्रकारच्याअफवांवर विश्वास न ठेवता आपल्या Cast crtificate वर बौद्ध म्हणुन नोंद करुन बौद्धांच्या आणि अनुसुचित जातीच्या दुहेरी योजनांचा फायदा घ्यावा. आणि जर उप आयुक्त अधिकारी तहशीलदार, अर्जनविस बौद्ध म्हणुन प्रमाणपत्र देत नसतील तर संबंधीतावर अनुसुचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, नागरी सुरक्षा कायदा 1955 अधिनियम क्रमांक 22 कर्तव्यातील हयगय उपभोगीतांना अडथडा आणणे नुसार दंडात्मक कार्यवाही दाखल करावी.
                    
                          ***

SC, ST आत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.


जात प्रतिबंध कायदा.( अॅट्रासिटी अॅक्ट)
SC, ST आत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.
जात प्रतिबंध कायदा हे फार मोठे हत्यार SC,ST यांना दिले आहे. या कायद्यांची प्रखर पणे आमलबजावनी व्हावी व दलितांवर आन्याय होउ नये यासाठी हा कायदा तयार केला. फक्त जाती वाचक बोलले म्हणजे अॅट्रासिटी लागते आसा गैरसमज आहे पण
21 मुद्द्यावर हे कलम लागू होते. हा कायद मेडियात पाठवन्याचा माझा उद्देश आसा आहे की लोकांना या कायद्यांची जानीवी जागृती व्हावी व गुन्हा करनार्याला कायदा कळावा आसे गुन्हे घडणार नाहीत.हाच उद्देश.
कलम 3(1)1:- योग्य व अयोग्य पदार्थ खान्या- पिन्याची सक्ती करणे.
कलम 3(1)2:- इजा,अपमान करणे व ञास देने.
कलम 3(1)3:- नग्न धिंड काडने, मानवी अप्रतिष्ठा करणे.
कलम 3(1)4:- जमीनीचा गैर प्रकारे उपभोग करने.
कलम 3(1)5:- मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण करने.
कलम 3(1)6:- बिगारीची कामे करन्यास सक्ती/भाग पाडणे.
कलम 3(1)7:- मतदान करण्यास भाग पाडणे, धाक दाखवणे.
कलम 3(1)8:- खोटी केस, खोटी फौजदारी करने.
कलम 3(1)9:- लोक सेवकास खोटी माहिती पुरवणे.
कलम 3(1)10:- सार्वजनिक ठिकाणी अपमान करने.
कलम 3(1)11:- महिलांचे विनयभंग करने.
कलम 3(1)12:- महिलेचे लैंगिक छळ करने.
कलम 3(1)13:- पिण्याचे पाणि दुषित करने किंवा घान करने.
कलम 3(1)14:- सार्वजनिक ठिकानी प्रवेश नाकारणे.
  कलम 3(1)15:- घर, गांव सोडण्यास भाग पाडणे.
कलम 3(2)1,2:- खोटी साक्षा व पुरावा देने.
कलम 3(2)3:- नुकसान करन्यासाठी आग लावणे.
कलम 3(2)4:- प्रार्थना स्थळ अथवा निवार्यासआग लावणे.
कलम 3(2)5:- IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करने.
कलम 3(2)6:- पुरावा नाहिसा करने.
कलम 3(2)7:- लोकसेवकाने कोणताही अपराध करने.
एवढया प्रकारे जात प्रतिबंध कायदा लावता येतो.
फिर्याद नोंदवितांना घ्यावयाची काळजी.
●●फिर्याद दाखल करावयास आल्यानंतर ठ!णेदाराने विना विलंब तक्रार नोंदउन घ्यावी.
●FIR मध्ये फिर्यादीचे व आरोपीचे नाव, जात, पत्ता काळजी पुर्वक स्पष्ट लिहावा. घटना कोनत्या कारणावरून घडली होती ते स्पष्ट नमूद करावे. फिर्याद उशीरा दाखल केली आसल्यास उशीराचे कारण लिहावे.जातीवाचक शिवीगाळ अथवा दुसरा कोनताही प्रकार आसेल त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
आरोपीच्या जातीच्या पुराव्यासाठी त्याच्या TC दाखला, पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.
फिर्यादीची व आरोपीची वैद्यकीय तपासनी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
गुन्हा नोंद झाल्या नंतर त्याच दिवसी जिल्हा पोलीस अधीक्षक , DOS,SDM, तहसिलदार व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना दुरध्वनी/फोन व्दारे संबंधित पोलीस स्टेशनने कळवावे.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी कडे खालील कागदपत्रे त्वरित पाटवावीत.
1) FIR .
2) घटणा स्थळ पंचनामा.
3) आत्याचार ग्रसतांचा जातीचा दाखला.
4) अरोपीच्या जाती बाबत TC. तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपञ .
5) अत्याचार ग्रसताचा वैद्यकीय तपासनी अहवाल व आरोपपत्र.आथिर्क मदतकसाठी वरील कागलपञ देने/ दाखल गरजेचे आहे.

एम.पी.एस.सी. Imp BOOKS

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा"खाली दिलेली काही पुस्तके एमपीएससी पुर्व तसेच पीएसआय पुर्वचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील.....(आपण ही यादी share करू शकता ... माहितीचा प्रसार होऊन अनेकांना फायदा होऊ शकतो ... आपण ही माहिती सर्वत्र प्रसारित केल्यास मला आनंदच होईल)महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी१)एमपीएससी पूर्वपरीक्षा :-१.इतिहास -डॉ.जयसिंगराव पवार२.भूगोल -i)१२ विंच क्रमिक पुस्तकii) द मेगा टेस्ट महाराष्ट्र -श्री.ए.बी.सवदीiii) भारताचा भूगोल -के सागर प्रकाशन३.राज्यशास्त्र /राज्यघटनाi)भारतीय राज्यघटना -स्वरुप आणि राजकारण :प्रा चि.ग.धांग्रेकरii) भारतीय राज्यघटना -प्रा.व्ही.बी.पाटीलiii) भारताची राज्यघटना आणि राजकीयव्यवहार -डॉ.वि.मा.बाचल४.समाजसुधारक -महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास -श्री.जी.एस.भिडे व श्री.एन.डी.पाटील५.पंचायत राज्य -प्रा.व्ही.बी.पाटील६.विज्ञान व तंत्रज्ञान -i)८ वी,९ वी,१० वीची विज्ञानाची क्रमिक पुस्तकii) विज्ञान व तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन -श्री एस.ए.चीतानंद व श्री.अशोक जैनiii) विज्ञान व तंत्रज्ञान व प्रगती -डॉ.जयसिंगराव पवारiv) विज्ञान व तंत्रज्ञान-रंजनकोळंबे७.अर्थशास्त्र घटक -i)स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्था -बी.ए.भाग १ व २प्रा.के.एम.भोसले व प्रा.के.बी.काटे(फडके प्रकाशन )ii) भारतीय अर्थव्यवस्था -रंजन कोळंबेiii) वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक -के सागर प्रकाशनiv) NCERT - Indian Economy -Chand Publication८.बुद्धिमापन चाचणीi) बुद्धिमापन चाचणी -अनिल अंकलगीii) संपूर्ण बुद्धिमती चाचणी -क्लुप्त्या आणि सूत्रे -पंढरीनाथ राणेiii) बुद्धिमता चाचणी -वा.ना.दांडेकर१०.चालू घडामोडी (मासिक )i) Study circle चे स्पर्धा -परीक्षा नोकरी संदर्भii) चाणक्य परिवार मासिकiii) भागीरथ प्रकाशनाच मासिकiv) लोकराज्य योजना (मराठी )v) वर्तमान पत्र९. K'sagar कलाशाखा घटना (गाइड स्वरूपाच )महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी१)एमपीएससी पूर्वपरीक्षा :-१.इतिहास -डॉ.जयसिंगराव पवार२.भूगोल -i)१२ विंच क्रमिक पुस्तकii) द मेगा टेस्ट महाराष्ट्र -श्री.ए.बी.सवदीiii) भारताचा भूगोल -के सागर प्रकाशन१०.राज्यशास्त्र/राज्यघटनाi)भारतीय राज्यघटना -स्वरुप आणि राजकारण :प्रा चि.ग.धांग्रेकरii) भारतीय राज्यघटना -प्रा.व्ही.बी.पाटीलiii) भारताची राज्यघटना आणि राजकीयव्यवहार -डॉ.वि.मा.बाचल११.समाजसुधारक -महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास -श्री.जी.एस.भिडे व श्री.एन.डी.पाटील१२.पंचायत राज्य -प्रा.व्ही.बी.पाटील१३.विज्ञान व तंत्रज्ञान -i)८ वी,९ वी,१० वीची विज्ञानाची क्रमिक पुस्तकii) विज्ञान व तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन -श्री एस.ए.चीतानंद व श्री.अशोक जैनiii) विज्ञान व तंत्रज्ञान व प्रगती -डॉ.जयसिंगराव पवारiv) विज्ञान व तंत्रज्ञान-रंजनकोळंबे१४.कृषी घटक -i) कृषी डायरी (राहुरी कृषी विद्यापीठ )ii) कृषिशास्त्र आणि कृषिविकास -रंजन कोळंबेiii) कृषिशास्त्र -सुहास दिवसे व दीपक तावरे (पंचम प्रकाशन )iv) कृषीविषयक घटक -के सागर प्रकाशन१५.अर्थशास्त्र घटक -i)स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्था -बी.ए.भाग १ व २प्रा.के.एम.भोसले व प्रा.के.बी.काटे(फडके प्रकाशन )ii) भारतीय अर्थव्यवस्था -रंजन कोळंबेiii) वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक -के सागर प्रकाशनiv) NCERT - Indian Economy -Chand Publication१६.बुद्धिमापन चाचणीi) बुद्धिमापन चाचणी -अनिल अंकलगीii) संपूर्ण बुद्धिमती चाचणी -क्लुप्त्या आणि सूत्रे -पंढरीनाथ राणेiii) बुद्धिमता चाचणी -वा.ना.दांडेकर१०.चालू घडामोडी (मासिक )i) Study circle चे स्पर्धा -परीक्षा नोकरी संदर्भii) चाणक्य परिवार मासिकiii) भागीरथ प्रकाशनाच मासिकiv) लोकराज्य योजना (मराठी )v) वर्तमान पत्र११. कलाशाखा घटना (गाइड स्वरूपाच ) www.pathridaily.blogspot.com

Tuesday, February 10, 2015

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद. 

कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम
www.pathridaily.blogspot.com

Monday, February 9, 2015

बिल गेट्स भाषण…

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत.
=========================
नियम १ –
आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
नियम २ – 
जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
नियम ३ –
कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
नियम ४ –
आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
नियम ५ –
तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
नियम ६ –
तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
नियम ७ –
उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
नियम ८ –
आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
नियम ९ –
टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
नियम १० –
सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल...
सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम

वाचा वे असे काहि…मुंबई येथे पार पडलेल्या तीन दिवस मराठी उदयोजक परिषद मध्ये मराठी अब्जाधीस उदयोगपती मा. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश.

मुंबई येथे पार पडलेल्या तीन दिवस मराठी उदयोजक परिषद मध्ये मराठी अब्जाधीस उदयोगपती  मा. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश.
          माझ्या आईने मला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की, बाबारे आयुष्यात कधी दोन कोट वाल्यांच्या नादी लागू नकोस. एक काळा कोटवाला, म्हणजे वकिलाच्या नादी लागू नका, कोर्टाची पायरी चढू नका आपण धंदेवाले आहोत. डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर ठेऊन 'तू बाबा मोठ्या बापाचा, जाणा बाबा' पण ती कोर्टाची पायरी नको. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, भाकरी एका जागी कधी ठेवायची नाही. तर दुसरा कोटवाला म्हणजे डॉक्टर, तुमची तब्येत खणखणीत ठेवा, लक्षात घ्या तुम्ही बिझनेस मध्ये आहात. उद्योग बिझनेस मध्ये असलेल्या लोकांनो, अरे आपल्याला आजारी पडायला परवानगी नाही रे. डॉक्टरच्या नादी कधी लागू नका याचा अर्थ तब्येत खणखणीत ठेवा.
        बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. अंथरून पाहून पाय पसराही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.
     बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार, तो एक नियम आहे.
      आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे, मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.
     मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.
     स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.
    आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.
         बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.
     धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
    व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.
    मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १० टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे...
सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम

Saturday, February 7, 2015

* मराठी व्याकरण :- थोडक्यात महत्त्वाचे


१.व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
२.वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण
म्हणतात.
१.स्वर :ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर
म्हणतात .
१.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
२.दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने
होतो त्यास स्वरादी म्हणतात
उदा-अं,आ:
४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे
उदा-अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर
उदा-अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त
स्वर होय .
उदा-अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
२.व्यंजन :
ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन
म्हणतात .
१.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
२.अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
३.स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
५.उष्ण व्यंजन :श ,ष ,स
६.नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
३.वर्णाची उच्चार स्थाने :
१.कंठ्य :क,अ,आ.
२.तालव्य :च,इ,ई,
३.मूर्धन्य :ट ,र,स.
४.दंत्य : त,ल,स
५.ओष्ठ्य :प,उ,ऊ .
६.अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
७.कंठ तालव्य :ए ,ऐ.
८.कंठ ओष्ठ :ओ,औ.
९.दान्तोष्ठ : व .
४.वर्णमाला शिकवितांना वापरावयाचे दृक श्राव्य साधने :
१.वर्णमालेच तक्ता वापरणे.
२.शब्द पट्या वापराव्या.
३.चित्राचा वापर करावा –गरुड “ग”
४.खादा फलक वापरावा.
५.रेषा,गोल,अर्धवर्तुळ ,कमान काढून दाखवणे,
६.रंगीत खडू व रंगीत चित्राचा वापर करणे .
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्ध करून देऊन
प्रात्यक्षिक देणे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घेणे.
५.शब्दाच्या जाती :
१.विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास
विकारी शब्द म्हणतात.
१.नाम (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पद
ार्थ ,जागा,
१.व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
२.जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
३.भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
४.समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२.सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग
टाळण्यासाठी
१.पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
२.निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
३.अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
४.संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
५.प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ?
कोणता ? केंव्हा ? किती ?
३.विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
१.गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
२.संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
३.परिणामवाचक विशेषण :
चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
४.संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४.क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
१.सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
२.अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
३.संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे
लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास
अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
१.स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
२.कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
३.परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
४.रितीवाचक क्रियाविशेषण :
अचानक,हळूहळू ,जोरात .
२.शब्दयोगी अव्यव :नामाला व
सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून
येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
३.उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य
एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
४.केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील
विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
५.लिंग विचार व वचन विचार :
लिंग विचार :
१.पुल्लिंग –मोर,विद्वान,उंट .
२.स्त्रील्लिंग :लांडोर,विदुषी,
सांडणी.
३.नपुसकलिंग : झाड,घर,पुस्तक .
वाचन विचार :
१.एक वचन: पुस्तक .
२.अनेक वचन : पुस्तके .
३.बहुवचन : आपण,तुम्ही .सारे,सर्व,
६.संधी विचार:
१.जगन्नाथ : जगत +नाथ .
२.गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .
३.सुर्याद्य : सूर्य + उदय .
४.लंकेश्वर : लंका + ईश्वर .
५.जलौघ : जल + ओघ .
६.यशोधन : यश + धन .
७.महर्षी : महा +ऋषी .
८.विद्यार्थी : विद्या +अर्थी .
९.सिंहासन : सिंह + आसन .
१०.श्रेयश : श्रेय + यश .
७.समास विचार :
१.तत्पुष समास :
गायरान,कुभकर,अज्ञान,नापसंत ,अनादर,अग्रेसर,
मावसभाऊ ,साखरभात .
२.द्वंद समास :
१.इतरेतर द्वंद समास : आणि,व
कृष्णार्जुन =कृष्णा आणि अर्जुन ,खरेखोटे =खरे व खोटे.
२.वैकल्पिक द्वंद समास : अथवा,किंवा,वा.
जयापजय =जय अथवा पराजय.
यशपयश =यशा अथवा अपयश .
३.समाहार द्वंद समास : वगैरे .
मीठभाकर =चटणी ,कांदा,वगैरे.
देवधर्म =पुजा ,आज्ञा,वगैरे.
३.दिवगु समास :
१.नऊग्रह : नऊग्रहाचा समूह.
२.पंचपाळे : पाच पाल्याचा समूह.
३.नवरात्र : नऊ रात्रीचा समूह.
४.पंचवटी : पाच नद्याच समूह .
४.बहुब्रूही समाज :
१.पितांबर : पिवळे वस्त्र धारण केले आहे असा तो महादेव .
२.नीलकंठ : नीळा आहे कंठ असतो .
३.गजानन : गजाचे आनंद असतो.
४.भालचंद्र : ज्याच्या शरीरावर भाला असतो.
५.अव्यायी भाव समास :
१.दररोज : प्रत्येक दिवसी .
२.दरवर्षी : प्रत्येक वर्षी .
८.प्रयोग ओळख :
१.मुले विटी दांडू खेळतात : कर्तरी प्रयोग.
२.गवळ्याने गाईला बांधले : भावे.
३.रामाने आंबा खाल्ला : कर्मणी प्रयोग .
४.राजु घरी आहे नाही :
कर्तरी प्रयोग .
५.राक्षसाने युद्ध केले : कर्मणी प्रयोग .
६.रामाने रावणास मारले : भावे प्रयोग .
९.वाक्य विचार :
१.अर्थावरून वाक्याचे प्रकार :
१.विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो.
२.प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ?
३.आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा.
४.उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे.
५.नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही .
६.होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो.
१०.रचनेवरून वाक्याचे प्रकार :
१.सरल (शुद्ध ) वाक्य : मी मराठी वाचतो एक
क्रिया.
२.मिश्र वाक्य : एक वाक्य प्रधान दुसरे गौण वाक्य.
उदा-तो म्हणाला कि मी पुस्तक वाचीन.
३.सयुक्त वाक्य : अनेक उपवाक्य असतात.
उदा –राजू शाळेत गेला त्याने शिक्षकास विचारले आणि पेपर
सोडायला बसला.
११.काळ विचार :
१.वर्तमान काळ : मी मराठी वाचतो.
२.भूतकाळ : मी मराठी वाचले .
३.भविष्य काळ :
मी मराठी वाचीन.
१२.एकूण विरांम् चिन्ह :
१.पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
२.अर्ध विरांम् (;)संयुक्त वाक्यात असतो.
३.अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू
ही चांगली माणसे होती.
४.प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
५.उदगारवाचक (!) वाह ! काय चांगले गाडी आहे.
६.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला,
“तुलदास राम भक्त होते”.
७.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
८.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम
आणि क्रोध .
९.कंस () स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून
मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
१०.द्वी बिंदू : मोर : आपला राष्ट्रीय
पक्षी आहे.
११.अधोरेखा (---------- ): चुकीचे ऐकणे
म्हणजे .......... होय .(अपश्रवन)
# मराठी शब्द अलंकार :-
व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण
करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे
अलंकार .
अलंकारांचे प्रकार:-
उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक
उपप्रकार आहे.
दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट
रीतीने वर्णन केलेले असते तेथे
उपमा अलंकार होतो. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य
पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे
वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण
रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे
उपमा हा अलंकार होतो.
उदा० सावळाच रंग
तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत
माया तुझी आम्हांवरी राहू दे
उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जणू उपमान
आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
(जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा० ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे
प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी
नेले मज वाटे
माहेरची वाटे
खरेखुरे
अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/
झाकणे) अपन्हुती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
*"उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते
तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो."
उदा.- न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात
'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा'
या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन'
या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार
झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
1. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |
2. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे |
3. आई म्हणोनि कोणी आईस हाक
मारी ती हाक येई कानी मज
होय शोक भारी नोहेच हाक माते
मारी कुणी कुठारी
अन्योक्ती:-
अन्योक्ती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. दुसर्यास उद्देशून
केलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे
त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून
आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत
तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
उदा:-येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू
करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे
विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक
पर्यायोक्ती:- एखादी गोष्ट आडवळणाने
सांगणे.त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत
आहेत. ( तुरुंगात आहेत)
विरोधाभास:-एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.
उदा:-
जरी आंधळी मी तुला पाहते
सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत
नाही
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक)
व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार
आहे.
*"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे
उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
ːउदा.- 'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे
उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत
या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे
वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
1. कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
2. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |
पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
3. सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो
रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक
उपप्रकार आहे.
उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक
अलंकार होतो.
उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी
अतिशयोक्ती:-
अतिशयोक्ती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात
असणारी कल्पना ही फारच फुगवून
सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार
होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात
अतिशयोक्ती असतेच पण
कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून
सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन
सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा: जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
अनन्वय:- अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक
उपप्रकार आहे.
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.
उदा: आहे ताजमहाल एक जगती तो तोच
त्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे
उपमान
भ्रान्तिमान:- उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम
निर्माण होणे.
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे
दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात
अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.
ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण
होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित
असतो.
कोणता मानू चंद्रमा ?
भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू
चंद्रमा कोणता?
दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.
उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार
अर्थान्तरन्यास:-अर्थान्तरन्यास
हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त
मांडणे.
(अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो कठिण समय
येता कोण कामास येतो?
स्वभावोक्ती:-एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे,
वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे
यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.
उदा:
गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच
काडी म्हणायचा अन मनाशीच
की या जागेवर बांधीन
माडी मिचकावुनी मग
उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच
अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील
नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार
होतो.
उदा: गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण
अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामधे
गरिबच्या गाजे संतांची वाणी
चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण
सांगणारी उक्ती)
चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक
उपप्रकार आहे.
*"जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू
सचेतन (सजीव) आहे असे मानून
ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते
असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती'
हा अलंकार होतो."
ːउदा.- डोकी अलगद घरे उचलती |
काळोखाच्या उशीवरूनी ||
स्पष्टीकरण- काळोखाच्या उशीवरून
(निर्जीव) घरे
आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून
जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक
माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे
चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
ːअन्य उदाहरणे-
1. चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी , काही केल्या फुलेना || [२]
2. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट
रजनी मूकपणे||
3. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते
खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक
ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास
यमक अलंकार होतो.
उदा: जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घ डो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिल हाही आ ला
आलापितो सुचवितो अरुणोदया ला
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने
जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा: सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत"
या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले
आहे.
शब्दश्लेष:- वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल
दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास
अर्थश्लेष म्हणतात
अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत
नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी
अर्थश्लेष:-वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल
दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास
अर्थश्लेष म्हणतात
अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच
साच कच - केस/कच हा हा
सभंग श्लेष:-
उदा: श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तीळ यांस,
तरी तुम्हांस
अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे
जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला,
परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले
असंगती:- कारण एका ठिकाणी आणि त्याचे
कार्य दुसर्याच ठिकाणी असे वर्णन असते.
कुणि कोडे माझे उकलिल का?
कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
सार:- एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून
उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे. काव्यात नाटके रम्य, नाटकांत
शकुंतला त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते
व्याजस्तुती:- बाह्यतः स्तुती आणि आतून
निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस
ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती
व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे)
एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण
देणे.
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस.
सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम
click here 
                --posted by --
www.pathridaily.blogspot.com

January Current Gk


१) भारताच्या विदेश दौर्यावर येणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
== ड्वाइट आइज़नहॉवर (Dwight Eisenhower)-१९५९
०२) गॉर्ड ऑफ ऑनर (Guard of Honour) देणारी विंग कमांडर पूजा ठाकूर वायुसेनेच्या कोणत्या शाखेत काम करते?
== पब्लिसिटी सेल
०३) यू.एस. सीक्रेट सर्विस (US Secret Service) च्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका ठिकाणी किती मिनिटे थांबू शकतात?
== ४५ मिनिटे
०४) प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टमध्ये आर्मीचे प्रतिनिधित्व कोणी केले होते?
== कॅप्टन दिव्या अजीत
०५) प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टमध्ये तिरंगा ध्वज फडकाविण्याचा बहुमान प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
== कॅप्टन हाओबाम बेला देवी(मणिपूर)
०६) एलेक्सिस सिपरस( सिरीज़ा पार्टी) हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत?
== ग्रीस
०७) भारत सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जाणारे आर.के.लक्ष्मण यांची “यू सेड इट” ही चित्रमालिका टाईम्स ऑफ इंडिया मध्ये कधीपासून प्रकाशित होत आहे?
== १९५१
०८) ६३व्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे?
== पॉलीना वेगा
०९) २०१४मध्ये जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ठरले आहे?
== दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
१०) २६ जानेवारी २०१५ ला पृथ्वीच्या अगदी जवळून गेलेल्या लघुग्रहाचे नाव काय होते?
== २००४ बी.एल.८६
सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम
            -- Posted by-- www.pathridaily.blogspot.com

Wednesday, February 4, 2015

!!..काही समाजसुधारकांची वृतपत्रे, मासिके व मुखपत्रे ..!!

!!..काही समाजसुधारकांची वृतपत्रे, मासिके व मुखपत्रे ..!!
साने गुरुजी - कॉंग्रेस व साधना (साप्ताहिक), विध्यार्थी (मासिक)
गोपाल हरी देशमुख - लोकहितवादी (मासिक), हितेच्छु (साप्ताहिक)
भाऊ महाजन - प्रभाकर(मासिक) व धुमकेतू (साप्ताहिक)
आचार्य विनोबा भावे - महरक़्श्त्र धर्म.
महात्मा गांधी - हरिजन व यंग इंडिया.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - उपासना.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - स्वराज(साप्ताहिक), गुरुदेव (मासिक)
बालाशाश्त्री जांभेकर - दर्पण (साप्ताहिक), दिग्दर्शक (मासिक)
गोपाल गणेश आगरकर - सुधारक.
भाई माधवराव बागल - अखंड भारत.
लो,टिळक - केसरी व मराठा.
विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला.
बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक), बहिष्कृत भारत (पाक्षिक), समता ( वृतपत्र )
पंजाबराव देशमुख - महाराष्ट्र केसरी.
न्यायमूर्ती रानडे - इंदुप्रकाश.
महात्मा ज्योतिबा फुले - दिन बंधू.

सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम

Tuesday, February 3, 2015

फोन न.: राज्य मंत्रिमंडळ

Sarkar aplya Dari
राज्य मंत्रिमंडळ
-------------------
1) मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस - मो.9373107881
2) महसूलमंत्री- एकनाथ खडसे-मो.942303667
3) वित्तमंत्री-सुधीर मुनगंटीवार-मो.9822223102
4) शालेय शिक्षण -विनोद तावडे- मो.9821053178
5) गृहनिर्माण- प्रकाश मेहता मो.9821043048
6) सहकार मंत्री- चंद्रकांत पाटील -9422304150
7)ग्रामविकास - पंकजा मुंडे -मो.9604041212
8) आदीवासी विकास- विष्णू सावरा -
मो.9422077293
9) अन्न नागरी पुरवठा-गिरीश बापट -
मो.9823040400
10) जलसंपदा -गिरीष महाजन-मो.9422292525
11) परिवहन -दिवाकर रावते -मो .9821143576,942
1457457
12) ऊद्योग - सुभाष देसाई -मो.9821037040
13) पर्यावरण - रामदास कदम -मो.9821083468
14) सार्वजनिक बांधकाम-एकनाथ शिंदे -
मो.9870075567
15) ऊर्जा -चंद्रशेखर बावनकुळे - मो.9860605555
16) पापु, स्वच्छता -बबनराव लोणीकर -
मो.9422135404
17) सार्वजनिक आरोग्य -डाॅ दीपक सावंत
-9821627600
18) सामाजिक न्याय -राजाराम बडोले -
मो.9421803512
---------------------------------------
राज्यमंत्री
------------
1)सामाजिक न्याय -दीलीप कांबळे -
मो.9850222491
2)महिला, बालविकास -विद्या ठाकूर-मो.976913
8925
3) गृहराज्यमंत्री - राम शिंदे - मो.9423167460
4) सार्वजनिक बांधकाम-विजय देशमुख -
मो.9822000089
5) महसूलमंत्री -संजय राठोड -9422166222/
9765594111.
6) सहकार - दादाजी भुसे -9422270593
7) जलसंपदा -विजय शिवतरे -9820081817,968
9918321.
8) वित्त,ग्रामविकास -दीपक केसरकर-9422096887
9) आदीवासी विकास-राजे अंब्रीशराव
अत्राम-9422555678.
10) गृहनिर्माण, ऊच्च.तंत्रशिक्षण -रविंद्र वायकर
-9594011111.
11) गृह (शहरे), नगरविकास, साप्र, विधी -रणजित
पाटिल-22875930
12) ऊद्योग, खनिकर्म पर्यावरण , सा.बां - प्रवीण
पोटे-पाटील-9464441237,9370152208,865017731


 सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम. 

विद्यूत ग्राहक अधिकार

LPG(GAS)ग्राहक अधिकार

जगाविषयी सामान्य ज्ञान

जगाविषयी सामान्य ज्ञान 1
* भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
* भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
* भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
* भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक
ठिकाण.
* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक
लांबीची समजली जाते.
* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून
म्हणतात.
* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात
असलेला देश.
* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने
ओळखतात.
* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण
साक्षरतेचा टप्पा गाठला.
* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
* दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच
इमारतीचा किताब मिळाला.
* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील
पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ.
येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध
राजवाडा येथे आहे.
* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र,
मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने
प्रसिद्ध आहे.
* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
* चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
* कॅनडा सर्वात लांब रस्ते.
* जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
* चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
* कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश
आहे.
* ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
* भारत चहा उत्पादनात प्रथम.
* बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
* घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
* अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
* सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
* क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
* चिली तांबे उत्पादनात प्रथम.
* मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
* कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
* अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
* कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
* अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
* अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
* चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त
संख्या असलेला देश आहे.
* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
* ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
* ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज
म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज
म्हणतात.
* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
* व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे
मुख्यालय आहे.
* ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे
मुख्यालय आहे.
* मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र
आहे.
* हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
* केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
* ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
* मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
* अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात
उंच धबधबा आहे.
* नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात
उंच पर्वतशिखर आहे.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट
आहे.
* रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
* थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
* मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
* जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
* शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
* इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
* जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
* इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
* भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने
आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ
जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.
विशेष ज्ञान 2
सांद्रीभवन – वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे
या क्रियेची संज्ञा.
सांभर – भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे
सरोवर.
साक्रामेंटो – कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी.
सागरमाथा – एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात.
सागरेश्वर – हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील
अभयारण्य.
सातारा – कोयना धरण या जिल्ह्यात आहे.
सातारा – महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.
सातारा –महाराष्ट्रात सर्वात जास्त
ग्रामपंचायती असणारा जिल्हा.
साने गुरुजी – श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.
सापेक्षतावाद – काल, अवकाश व वस्तुमान
या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन
करणारा सिद्धांत.
साबरमती – म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली.
सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात
दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
सामवेद – चार वेदांपैकी तिसरा वेद.
सायली – गिनी या राष्ट्राचे चलन.
सारनाथ – अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला.
सारनाथ – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ.
सार्क – दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना.
सावकारी – संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.
सावर – या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात.
सिंधुदुर्ग – भारतातील पहिला पर्यटन किल्ला
@@@@@@@@@@@@@
भारतातील पहिले ,भारतातील सर्वात
पहिली महिला :सर्वात लहान/कमी :सर्वप्रथम
घटना :सर्वात लांब :.
भारतातील पहिले :
* भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज
* पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे
* पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन
* राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी
* पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद
* पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू
* पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)
* स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा
* पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर
* भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)
* इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय
भारतातील सर्वात पहिली महिला :
* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
* पंतप्रधान- इंदिरा गांधी
* महिला राजदूत- विजयालक्ष्मी
* पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती-
रझिया सुलतान
* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष-
विजयालक्ष्मी पंडित
* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
भारतातील सर्वात लहान/कमी :
* सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)
* सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम
* सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वप्रथम घटना :
* पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)
* पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)
* पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४
* पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)
* पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७
* पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)
* पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)
* पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)
* पहिली पंचवार्षिक योजना- १९५१
* पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२
* पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान
* पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)
* पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)
* भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)
* पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)
* पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)
भारतातील सर्वात लांब :.
* लेणी- अजिंठा (महाराष्ट्र)
* रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा
* सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा)
* लांब धरण- हिराकुड (ओरिसा)
दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान
* 'अ' जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
* 'ड' जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* 'क' जीवनसत्त्व म्हणजे 'अॅस्कॉरबीक अॅसिड' शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये 'क' जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून
दुधाला 'पूर्णान्न' म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.
* 'ड' जीवनसत्त्वाअभावी 'मुडदूस व दंतक्षय' हा रोग होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस
असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.
* 'ओ' या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
'सर्वयोग्य दाता' असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त
प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व
कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये 'सोडियम क्लोराईड' असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील 'लिपोप्रोटीन' नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.
* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 'लिपिड प्रोफाईल'द्वारे मोजले
जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य 'साखर' हा घटक
करतो.
* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील
आजाराकरिता घेतले जातात.
* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर
करतात.
* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक
म्हणजे सोडियम २४ होय.
* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र
असतात.
* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.
* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे
मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन
जीवांची निर्मिती होते.
विशेष ज्ञान 1
शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव.
श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी.
श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात
आलेला पहिला मराठी चित्रपट.
संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम
त्यांच्या या मित्राने केले.
संथाल – हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.
संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती.
संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या.
सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ.
सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी.
सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग.
सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला.
सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन.
सम्राट अशोक – ' देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ' असे वर्णन
करण्यात आलेला भारतीय सम्राट.
सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल.
सहा – वाळवीच्या पायांची संख्या.
सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट.
सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट.
सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु.
--------------------------
शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.
शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी.
शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही.
शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर.
शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.
शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत
बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.
शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.
शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.
शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी.
शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील
पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)
शिलिंग - टांझानिया देशाचे चलन.
शिलॉंग – मेघालयची राजधानी.
शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.
शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.
शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय.
शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.
शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.
शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे
स्वतःभोलती फिरतो.
शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी.

--सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम