Sunday, May 17, 2020

मानवत येथून तीस उत्तर प्रदेश येथील परप्रातीय मजुर एस टि बस ने रवाना.

मानवत येथून तीस मजुर औरंगाबाद येथे एस टि बस ने रवाना.
[]औरंगाबाद येथुन रेल्वेने उत्तर प्रदेशला पाठविणार []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि. १७:  लॉकडाऊन मुळे प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर आता मजूर आपल्याला आपल्या गावी परतु लागले आहे  प्रशासनाच्यावतीने एसटी बसची सोय केली जात आहे मानवत तालुक्यात  उतरप्रदेश येथून आलेल्या  ३० मजुर आलेले होते या मजुरांना जाण्यासाठी  तालुका प्रशासनाने माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसची सोय करून दि.१६ मे रोजी  सकाळी त्यांना मानवत येथून औरंगाबाद येथे पाठविण्यात आले  गेल्या खूप दिवसापासून देशभरात लाँकडाउन सुरू आहे या मुळे प्रत्येकी तालुक्यात जिल्हास्तरावर इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत या मजुरांचे हाल होत असल्याने सदरील मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली आरोग्य तपासणी करून मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहेत त्यांची प्रवासाची सोय महामंडळाच्यावतीने केली जात असून मानवत येथे तीस मजूर अडकून पडले होते या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी माननीय तहसीलदार डी.डी. फुपाटे साहेब ,नायब तहसीलदार नकुल वाघुंडे साहेब, न.पा.चे. मुख्य अधिकारी उमेश ढाकणे साहेब, मानवत बस स्थानकाचे  प्रमुख  जाधव साहेब,  गोपनीय शाखेचे नारायण ठमके यांनी मजुरांसाठी बसची व्यवस्था केली होती डॉ.ललित कोकरे. वैद्यकीय अधिकारी,श्री.सुनिल खरात.औषध निर्माण अधिकारी.ग्रा.रु. यांनी   डॉ.नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची  मानवत बसस्थानक येथे थरमल तपासणी करुन मजुराना सकाळी बसमध्ये बसवुन  मानवत बसस्थानकावरुन औरंगाबाद येथे  पाठवून दिले आहे औरंगाबाद येथुन विशेष रेल्वेने हे मजुर उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक,तलाठी अरविंद चव्हाण ,अरुण मानेकर,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment